शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

रस्त्यावरील विद्युत खांब हटणार

By admin | Updated: November 4, 2014 22:40 IST

शहरातील मुख्य मार्गावर असलेले विद्युत खांब हटवून भूमिगत विद्युत लाईन टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली असून त्यासाठी नगर परिषदेने सुमारे सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर असलेले विद्युत खांब हटवून भूमिगत विद्युत लाईन टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली असून त्यासाठी नगर परिषदेने सुमारे सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. गडचिरोली शहरातील आरमोरी, धानोरा, चामोर्शी व मुल या राज्य महामार्गावरून दरदिवशी हजारो वाहने धावतात. शहराची वाढती लोकसंख्या व वाढलेली वाहनांची संख्या लक्षात घेतली तर या मार्गांचे रूंदीकरण होणे आवश्यक होते. मात्र रस्त्याच्या बाजूला दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्यांची रूंदी कमी झाली आहे. रस्ते अरूंद असतांनाच नगर परिषदेने चारही मार्गावर रस्ता दुभाजक बांधले आहे. या रस्ता दुभाजकामुळे रस्त्यांची रूंदी आणखी कमी झाली आहे. रस्ता दुभाजक बांधतेवेळी रस्त्यावर असलेले विद्युत खांब हटविणे आवश्यक होते. विद्युत खांबांना वाहने धडक देऊन आजपर्यंत अनेक अपघात घडले आहेत. सदर विद्युत खांब हटविण्याची मागणी नागरिकांकडून मागील २ वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र नगर परिषद प्रशासन व विद्युत विभागसुद्धा याकडे सोयीस्कर कानाडोळा करीत होते. गडचिरोली शहरातून राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग झाल्यास आंतरराज्यीय वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रस्ता रूंदीकरणाचे हाती घेतले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर विद्युत खांब फार मोठी अडचण निर्माण करणार असल्याचे लक्षात आल्यानंतर रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे चारही मार्गावरील विद्युत खांब हटविण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. चारही मार्गावर भूमिगत विद्युत लाईन टाकली जाणार आहे. नगर परिषदेने चारही मार्गावरील विद्युत खांब, डीपी हटवून भूमिगत विद्युत लाईन टाकण्याच्या कामासाठी सुमारे सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर काम कंत्राटदाराच्या मार्फतीने करण्यात येत आहे. भूमिगत विद्युत लाईन टाकल्यानंतर ठराविक अंतरावर विद्युत डिस्ट्रीब्युशन बॉक्स बसविण्यात आले आहेत. या बॉक्सच्या शेजारी विद्युत खांब उभे करण्यात आले आहेत. या विद्युत खांबावरून नागरिकांना विद्युत पुरवठा केला जाणार आहे. विद्युत खांब हटल्यामुळे अपघातामध्ये घट होईल, अशी अपेक्षा शहरातील नागरिक करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)