शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST

गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवार, दि.१५ रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. उत्तर ...

गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवार, दि.१५ रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. उत्तर भागातील ६ तालुक्यांपैकी कोरची आणि धानोरा तालुक्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर ड्युटी लागलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बुधवारी हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहोचवण्यात आले. इतर केंद्रांवरील कर्मचारी गुरुवारी रवाना होतील.

कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा आणि गडचिरोली या सहा तालुक्यांमध्ये शुक्रवारी मतदान होणार आहे. या तालुक्यांमध्ये एकही नामांकन दाखल न झालेल्या २ ग्रामपंचायती आहेत. तसेच १३ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांची पूर्णपणे बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय १३ ग्रामपंचायतींमध्ये काही जागा बिनविरोध निवडल्या गेल्या तर काही जागांवरील नामांकन वैध ठरले नाही. त्या १३ ग्रामपंचायतींमध्येही प्रत्यक्ष मतदान होणार नाही. आता मतदानासाठी १७० ग्रामपंचायती उरल्या असून, त्यातील ११२४ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

एकूण ६१८ केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर ४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस व इतर सुरक्षा दल कार्यरत राहणार आहे.

धानोरा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींमध्ये एकही नामनिर्देशनपत्र दाखल न झाल्याने त्या ठिकाणी मतदान होणार नाही. तसेच पूर्णत: बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये गडचिरोली व कोरची तालुक्यात प्रत्येकी ४, आरमोरी व धानोरा तालुक्यात प्रत्येकी २ आणि कुरखेडा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

(बॉक्स)

मतदानाच्या दिवशी सुटी किंवा दोन तासांची सवलत

- राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. सर्व मतदारांना मतदानाचा हक्क योग्यरीतीने बजावता यावा यासाठी शासनाकडून परिपत्रकाच्या आधारे सूचना करण्यात आली आहे. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना निवडणुकीच्या दिवशी भरपगारी सुटी देण्याची सूचना करण्यात आली आहे.

- अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना हक्क बजावण्यासाठी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. अशी सवलत न देणाऱ्यांबद्दल तक्रार आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.