शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

वर्षभरात तीन काेटींची दारू जिल्हा पाेलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी करण्यात आली आहे. तरीही नजीकच्या भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर जिल्हे तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून दारू आणून विकली जाते. अवैध दारूची विक्री, वाहतुक हा काही नागरिकांचा राेजगारच बनला आहे. अवैधरित्या आणलेली दारू दामदुप्पट दराने विक्री केली जाते. तसेच त्यामध्ये काही प्रमाणात भेसळही केली जाते. यातून दारू तस्कर गब्बर हाेत असले तरी अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त आहेत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पाेलीस प्रशासनाने २०२१ या वर्षात जिल्हाभरात ३०१ कारवाया करून ३९२ दारूविक्रेत्यांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे २ काेटी ९४ लाख ३० हजार रुपयांची दारू व अन्य साहित्य जप्त केले आहेत. गडचिराेली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी करण्यात आली आहे. तरीही नजीकच्या भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर जिल्हे तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून दारू आणून विकली जाते. अवैध दारूची विक्री, वाहतुक हा काही नागरिकांचा राेजगारच बनला आहे. अवैधरित्या आणलेली दारू दामदुप्पट दराने विक्री केली जाते. तसेच त्यामध्ये काही प्रमाणात भेसळही केली जाते. यातून दारू तस्कर गब्बर हाेत असले तरी अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त आहेत आहेत. दारूविक्री व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पाेलीस विभाग प्रयत्न करीत असला तरी पाेलिसांच्या डाेळ्यात धूळ झाेकून दारूविक्री केली जाते. पाेलिसांमार्फत विविध ठिकाणी सापळा रचून कारवाई केली जाते. गाेपनीय सुत्रांकडून माहिती काढून पाेलीस विभागामार्फत सापळे रचले जात असले तरी पाेलिसांनाही गुंगारा देत दारू वाहतूकदार दारूविक्रेत्यांपर्यंत दारू पाेहाेचवितात. त्यामुळेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्थळी व माेठ्या गावांमध्ये खुलेआम दारू मिळते.

देशी बंद असताना माेहाच्या दारूवर भरचंद्रपूर जिल्ह्यात शासनाने जवळपास सहा वर्षे दारूबंदी केली हाेती. राज्य शासनाने २७ मे २०२१ राेजी दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्ह्याची सीमा गडचिराेली जिल्ह्याला लागून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून येणारी दारू बंद झाल्याने येथील दारूशाैकीन माेहफुलाच्या दारूकडे वळले. दुर्गम भागात माेहफुलाची दारू वर्षभर काढली जाते. ग्रामीण भागातील काही नागरिक या दारूची विक्रीसुद्धा करतात.

युवकांना गांजाचाही छंद

-    गांजा पिणे व विक्रीवर राज्यभरात बंदी असली तरी याचीही तस्करी जिल्ह्यात केली जाते. गांजाच्या आहारी प्रामुख्याने युवक गेले असल्याचे दिसून येते. पाेलीस विभागाने वर्षभराच्या कालावधीत २७ हजार २२० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. जिल्ह्यात गांजा पिणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने गांजाच्या विक्रीवर पाेलीस विभागाने करडी नजर ठेवण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :liquor banदारूबंदी