शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भर उन्हाळ्यात आरमोरीत पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

उन्हाळ्याची सुरुवात होताच दरवर्षी मोठ्या प्रमाणात आरमोरीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या कित्येक दिवसांपासून  पाणी समस्येने डोके वर काढले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी  शहरातील नागरिकांना  भरउन्हात आता वणवण फिरण्याची वेळ आली आहे. आधीच एक दिवसाआड शहरात आळीपाळीने पाणीपुरवठा केला जात होता. त्यात पुन्हा विजेच्या समस्येने भर घातली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे आणि कमी दाबाचा  वीजपुरवठा असल्याने त्याचा फटका येथील पाणीपुरवठा नळ योजनेला बसत आहे. नळ योजना कुचकामी असल्याने नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. विजेच्या समस्येमुळे जलकुंभ भरणाऱ्या मोटार सुरू होत नाही. परिणामी नळातून पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे. ग्रामपंचायत असतानापासून आरमोरीकर पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. मात्र नगरपरिषद होऊनही पाण्याचा प्रश्न अजूनपर्यंत मार्गी लागला नाही. त्यामुळे उन्हाळ्यात आरमोरीत पाणी पेटू लागले आहे.उन्हाळ्याची सुरुवात होताच दरवर्षी मोठ्या प्रमाणात आरमोरीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या कित्येक दिवसांपासून  पाणी समस्येने डोके वर काढले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी  शहरातील नागरिकांना  भरउन्हात आता वणवण फिरण्याची वेळ आली आहे. आधीच एक दिवसाआड शहरात आळीपाळीने पाणीपुरवठा केला जात होता. त्यात पुन्हा विजेच्या समस्येने भर घातली आहे. शहरात दोन ते तीन दिवसांआड आळीपाळीने पाणीपुरवठा केला जात आहे. 

विजेवरील उपकरणे कुचकामीआरमोरी शहराला वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. वैनगंगा नदीपात्रालगत लावण्यात आलेली विद्युत जोडणी सिंगल फेजची आहे. विद्युत दाब कमी राहात असल्यामुळे जलकुंभ भरण्यासाठी लावलेले विद्युत यंत्र सुरूच होत नाही. त्यातल्या त्यात उन्हाळ्याची सुरुवात झाल्यापासून शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे विद्युत यंत्रणेवर चालणारी उपकरणेही खराब होत आहेत.

नगर परिषद आरमोरीतर्फे शहराला  पाणीपुरवठा करण्यास आपण तत्पर आहोत. परंतु विद्युत विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ भरत नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. मी पाणीपुरवठा सभापती असल्यामुळे शहरातील रहिवाशांचा रोष मला सहन करावा लागत आहे. रीतसर विद्युत पुरवठा झाला तर पाण्याची अडचण भासणार नाही.  - विलास पारधीपाणीपुरवठा सभापती, नप आरमोरी

 

टॅग्स :water shortageपाणीकपात