शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

भर उन्हाळ्यात आरमोरीत पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

उन्हाळ्याची सुरुवात होताच दरवर्षी मोठ्या प्रमाणात आरमोरीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या कित्येक दिवसांपासून  पाणी समस्येने डोके वर काढले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी  शहरातील नागरिकांना  भरउन्हात आता वणवण फिरण्याची वेळ आली आहे. आधीच एक दिवसाआड शहरात आळीपाळीने पाणीपुरवठा केला जात होता. त्यात पुन्हा विजेच्या समस्येने भर घातली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे आणि कमी दाबाचा  वीजपुरवठा असल्याने त्याचा फटका येथील पाणीपुरवठा नळ योजनेला बसत आहे. नळ योजना कुचकामी असल्याने नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. विजेच्या समस्येमुळे जलकुंभ भरणाऱ्या मोटार सुरू होत नाही. परिणामी नळातून पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे. ग्रामपंचायत असतानापासून आरमोरीकर पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. मात्र नगरपरिषद होऊनही पाण्याचा प्रश्न अजूनपर्यंत मार्गी लागला नाही. त्यामुळे उन्हाळ्यात आरमोरीत पाणी पेटू लागले आहे.उन्हाळ्याची सुरुवात होताच दरवर्षी मोठ्या प्रमाणात आरमोरीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या कित्येक दिवसांपासून  पाणी समस्येने डोके वर काढले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी  शहरातील नागरिकांना  भरउन्हात आता वणवण फिरण्याची वेळ आली आहे. आधीच एक दिवसाआड शहरात आळीपाळीने पाणीपुरवठा केला जात होता. त्यात पुन्हा विजेच्या समस्येने भर घातली आहे. शहरात दोन ते तीन दिवसांआड आळीपाळीने पाणीपुरवठा केला जात आहे. 

विजेवरील उपकरणे कुचकामीआरमोरी शहराला वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. वैनगंगा नदीपात्रालगत लावण्यात आलेली विद्युत जोडणी सिंगल फेजची आहे. विद्युत दाब कमी राहात असल्यामुळे जलकुंभ भरण्यासाठी लावलेले विद्युत यंत्र सुरूच होत नाही. त्यातल्या त्यात उन्हाळ्याची सुरुवात झाल्यापासून शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे विद्युत यंत्रणेवर चालणारी उपकरणेही खराब होत आहेत.

नगर परिषद आरमोरीतर्फे शहराला  पाणीपुरवठा करण्यास आपण तत्पर आहोत. परंतु विद्युत विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ भरत नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. मी पाणीपुरवठा सभापती असल्यामुळे शहरातील रहिवाशांचा रोष मला सहन करावा लागत आहे. रीतसर विद्युत पुरवठा झाला तर पाण्याची अडचण भासणार नाही.  - विलास पारधीपाणीपुरवठा सभापती, नप आरमोरी

 

टॅग्स :water shortageपाणीकपात