शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
2
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
6
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
8
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
9
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
10
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
11
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
12
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
13
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
14
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
15
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
16
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
17
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
18
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
19
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
20
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी

वाघिणीमुळे अभयारण्यातील गावांमध्ये पसरली दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आरमोरी व देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालणाºया वाघिणीला २९ आॅगस्ट रोजी चपराळा अभयारण्यात सोडण्यात आले. त्यामुळे अभयारण्यात असलेल्या मार्र्कंडा (कं.), धन्नुर, चौडमपल्ली, चंदनखेडी, चपराळा, सिंघनपल्ली या गावांतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शासनाने चपराळा अभयारण्य १९८६ मध्ये घोषीत केले. या अभयारण्याची सीमा १३४ चौरस किमीपर्यंत पसरली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आरमोरी व देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालणाºया वाघिणीला २९ आॅगस्ट रोजी चपराळा अभयारण्यात सोडण्यात आले. त्यामुळे अभयारण्यात असलेल्या मार्र्कंडा (कं.), धन्नुर, चौडमपल्ली, चंदनखेडी, चपराळा, सिंघनपल्ली या गावांतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शासनाने चपराळा अभयारण्य १९८६ मध्ये घोषीत केले. या अभयारण्याची सीमा १३४ चौरस किमीपर्यंत पसरली आहे. या अभयारण्यात वाघ नसल्याने हरीण, सांबर, चितळ यासारख्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासनाने अभयारण्य घोषीत केले. मात्र या अंतर्गत येणाºया गावांचे पुनर्वसन केले नाही. त्यामुळे चपराळा, धन्नुर, मार्र्कंडा कं., सिंगमपल्ली, चौडमपल्ली ही गावे अजुनही अभयारण्याच्या परिसरातच आहेत. आजपर्यंत या ठिकाणी वाघ, बिबट यासारखा हिंस्त्रप्राणी नसल्याने अभयारण्यात असूनही स्थानिक नागरिकांची कोणतीही तक्रार नव्हती. आता मात्र या अभयारण्यात नरभक्षक असल्याचा संशय असलेली वाघिण सोडण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. जंगलामध्ये शिकारीसाठी असंख्य प्राणी आहेत. जंगलातच पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत वाघ रस्त्यांवर किंवा गावात येणार नाही, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाºयांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.चपराळा अभयारण्यात येणाºया सहाही गावांमध्ये वन विभागामार्फत दवंडी दिली आहे. नागरिकांनी आपली जनावरे जंगलात सोडू नये व नागरिकांनी जंगलातही जाऊ नये. वाघिणीला कॉलर आयडी लावण्यात आला आहे. या माध्यमातून वाघिणीच्या हालचालींवर नियंत्रण राहणार आहे.- डी. व्ही. कैलुके, वन परिक्षेत्राधिकारी, वन्यजीव कार्यालय चौडमपल्लीउन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीरसद्य:स्थितीत चपराळा अभयारण्यात पाणी व प्राणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे पावसाळा व हिवाळाभर वाघिणीला कोणतीच समस्या जाणवणार नाही. मात्र उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवणार आहे. झुडूपे नसल्याने शिकार करण्यासही अडचण निर्माण होणार आहे. या अगोदर या अभयारण्यात दोन वाघ सोडण्यात आले होते. मात्र पाण्याच्या टंचाईमुळे वाघांनी पळ काढला होता.