शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अमर्यादित उपशातून जमिनीची कोरड वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 23:39 IST

दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याचा उपसा वाढत असताना जल पुनर्भरणाच्या उपाययोजनांकडे मात्र पाठ फिरविण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी आणखी खोल जात आहे. गेल्या पाच वर्षातील सरासरी पातळीच्या तुलनेत यावर्षी पाण्याची पातळी ०.३४ मीटरने खोल गेली आहे.

ठळक मुद्देपातळी खालावली : खासगी बोअरवेल यंत्रणेच्या नियंत्रणाबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याचा उपसा वाढत असताना जल पुनर्भरणाच्या उपाययोजनांकडे मात्र पाठ फिरविण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी आणखी खोल जात आहे. गेल्या पाच वर्षातील सरासरी पातळीच्या तुलनेत यावर्षी पाण्याची पातळी ०.३४ मीटरने खोल गेली आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास गडचिरोलीवासीयांना येत्या काही वर्षात उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण होणार आहे.अनेक गावांमध्ये पाण्याच्या सुविधेसाठी नागरी वसाहतीत बोअरवेल (हातपंप) खोदल्या जातात. पाणी पुरवठा विभागाकडून त्याबाबतचा प्रस्ताव गेल्यानंतर जिल्हाधिकारी त्या बोअरवेल खोदण्यास मंजुरी देतात. यावर्षीही २८ बोअरवेलला काही दिवसांपूर्वीच मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक वापरासाठी असलेल्या अशा बोअरवेलला मंजुरी देताना नागरी सुविधेचा निकष लावला जातो. पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीसाठी ते गरजेचेही मानले जाते. परंतू अनेक लोक स्वत:च्या जागेत कोणतीही परवानगी न घेता खासगी बोअरवेल तयार करून त्यावर मोटर बसवत आहेत. त्यातून अमर्याद पाणी उपसा सुरू आहे. अशा खासगी बोअरवेलची संख्या शहरी भागात दररोज वाढत आहे. सार्वजनिक नळाची सुविधा असतानासुद्धा अशा पद्धतीने अनधिकृत बोअरवेल खोदण्याचे प्रमाण वाढत असून त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.ग्रामपंचायतींकडून येणाऱ्या बोअरवेलच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासासाठी भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यरत आहे. जमिनीतील पाणीपातळीची तपासणी करून सार्वजनिक हितासाठी ६० मीटरपर्यंतच्या (२०० फूट) बोअरवेलला परवानगी देण्याचे काम ही यंत्रणा करते. परंतू आपल्या घराच्या आवारात बोअरवेल खोदणारे कोणतीच परवानगी न घेता अनधिकृतपणे पाण्याचा उपसा करत आहेत. त्यांच्यावर सरकारी यंत्रणेचे कोणतेच नियंत्रण नसून कोणावरच कारवाई होताना दिसत नाही.भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या नोंदीनुसार गेल्या पाच वर्षाची जिल्ह्याची सरासरी पाणी पातळी ६.२७ मीटर आहे. मात्र यावर्षीची पाणी पातळी ६.६१ मीटरवर गेली आहे. आरमोरी, वडसा, धानोरा आणि मूलचेरा या तालुक्यांमध्ये आहे.रेनवॉटर हॉर्वेस्टिंगचा विसरकाही वर्षांपूर्वी नवीन बांधल्या जाणाºया सरकारी इमारतींसाठी रेनवॉटर हॉर्वेस्टिंग सक्तीचे करण्यात आले आहे. राज्यात अनेक भागात त्याशिवाय बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्रच दिले जात नाही. गडचिरोलीत मात्र नव्याने बांधलेल्या अनेक सरकारी इमारतींमध्येही या प्रकारची सुविधा नाही. याची तपासणी केल्यास सदर यंत्रणेचा कारभार उघड होऊ शकेल.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई