शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

दुचाकीसह नदीत बुडून जावई-सासऱ्याचा मृत्यू, लोखंडी पुलावरून तोल गेल्याने घात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 19:33 IST

अहेरी तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या वांगेपल्लीनजीकच्या प्राणहिता नदीपात्रात दुचाकी कोसळून जावई व सास-याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अहेरी (गडचिरोली) : अहेरी तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या वांगेपल्लीनजीकच्या प्राणहिता नदीपात्रात दुचाकी कोसळून जावई व सास-याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. दिनकर रेड्डी पोरेड्डीवार (४८) रा. कागजनगर (तेलंगणा) आणि बापुराव येमनुरवार (६५), रा.अहेरी अशी मृतांची नावे आहेत.दिनकररेड्डी पोरेड्डीवार हे आपल्या नातेवाईकडील वास्तूपुजनासाठी अहेरी येथे आले होते. शुक्रवारी कार्यक्रम आटोपून ते कागजनगरकडे परत जाणार होते. त्यावेळी त्यांचे सासरे बापूराव यमनूरवार यांनी आपल्या मुलीच्या भेटीसाठी आपल्या जावयासोबत येण्याची इच्छा दर्शविली. दुपारी १ वाजताच्या सुमारास जावई दिनकर रेड्डी पोरेड्डीवार व सासरे बापूराव यमनूरवार हे एमएच ३३ के ३१६८ क्रमांकाच्या दुचाकीने काजगनगरकडे निघाले. प्राणहिता नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने खालच्या बाजूने उभारलेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या लोखंडी पूलावरून ते दुचाकीने जात होते. दरम्यान या पुलावरून तोल गेल्याने त्यांची दुचाकी खाली कोसळली व दोघांचाही नदीत बुडून मृत्यू झाला.दुपारी २.३० वाजताच्या सुमारास जावई दिनकर पोरेड्डीवार यांचा मृतदेह प्रवाहात पुढे तरंगताना दिसला. तसेच बापूराव यांचा मृतदेह दुपारी ४ वाजता तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच अहेरीचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधाकर कुमरे, पोलीस हवालदार बेगलाजी दुर्गे, रवींद्र चौधरी, रोहनकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्यातील दोन्ही मृतदेह बाहेर काढले. एकाच परिवारातील जावई आणि सासºयाचा बुडून मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर शोककळा पसरली. दिनकर पोरेड्डीवार यांचा कागजनगर येथे फोटो स्टुडिओचा व्यवसाय होता. बापूराव यमनूरवार यांचा शेतीचा व्यवसाय होता.-तर घटना घडलीच नसतीप्राणहिता नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. बाजूला वाहने ये-जा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता बांधून व लोखंडी पूल लावण्यात आला आहे. मात्र हा लोखंडी पूल फक्त चार चाकी वाहने जाईल या बेताने मधुन जागा सोडलेला आहे. त्यामुळे तीनचाकी वाहन, दुचाकीधारकांना जीव धोक्यात टाकूनच प्रवास करावा लागतो. पूर्णव्याप्त लोखंडी पूल त्या ठिकाणी असता तर ही घटना घडली नसती. यापूर्वीही अहेरी येथील युवक याच लोखंडी पुलावरून दुचाकीने कोसळून नदीत पडून मरण पावला होता. या लोखंडी पुलाने आतापर्यंत तीन जणांचा बळी घेतला आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली