शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

वाढत्या उष्णतामानामुळे शेती कामावर परिणाम

By admin | Updated: May 22, 2015 01:45 IST

गेल्या चार दिवसांपासून विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातही तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला असून शहरी व ग्रामीण भागात रस्ते निर्मनुष्य झाले आहे.

गडचिरोली : गेल्या चार दिवसांपासून विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातही तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला असून शहरी व ग्रामीण भागात रस्ते निर्मनुष्य झाले आहे. शहरी भागात वाढत्या उष्णतामानापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेय मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मे महिन्यात यावर्षी दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह अकाली पाऊस झाला. त्यानंतर वातावरणातील उकाडा एकदम वाढला. दमट स्वरूपाचे हवामान निर्माण झाले व गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड उष्णतामान वाढले आहे. विदर्भाचा उष्णतामानाचा पारा ४७ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. गडचिरोली जिल्ह्यात तापमान मोजण्याची कुठेही व्यवस्था नाही. मात्र काही हौशी नागरिकांनी वेबसाईटवर गडचिरोलीच्या तापमानाची नोंद ४३ डिग्री सेल्सिसीअस बुधवारी दाखविण्यात आल्याची माहिती लोकमतशी बोलताना दिली. एकूणच गेल्या दोन-चार दिवसात तापमान प्रचंड वाढले असल्याने खरीप हंगामासाठी शेती मशागतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांच्याही कामावर परिणाम झाला आहे. सकाळी १० वाजतापासूनच उन्हाच्या झळा जाणवत असल्याने अनेक शेतकरी आता पहाटेच शेतात जाऊन सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत काम आटोपतात. रात्रीही १० वाजेपर्यंत उष्णतामान वाढूनच राहत असल्याचे दिसून येत आहे. शहरातही दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत असून कुलर व वातानुकुलीत यंत्रणेचा वापर अचानक वाढल्यामुळे महावितरण कंपनीचा वीज पुरवठाही अनेक वेळा काही वेळासाठी खंडित होण्याचा प्रकार गेल्या चार-पाच दिवसांत वाढला आहे. वाढत्या उष्णतामानापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेय व थंड पाण्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पाणी पाऊचची विक्रीही वाढली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)