शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची पंचाईत

By admin | Updated: November 11, 2015 00:51 IST

आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत केंद्रांवर धान खरेदी केली जाते.

केंद्र सुरू करा : व्यापाऱ्यांच्या घशात धान जाण्याची शक्यतावैरागड : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत केंद्रांवर धान खरेदी केली जाते. मात्र दिवाळीचा सण येऊनही आरमोरी तालुक्यातील वैरागड भागातील एकही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे धान कवडीमोल भावात खासगी व्यापाऱ्यांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांची प्रचंड पंचाईत झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे धान पिकाचा उतारा कमी आहे. जे काही तुटपूंजे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले आहे. ते कवडीमोल भावाने खासगी व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. खासगी व्यापारी प्लास्टिकच्या बारदान्याचा अडीच किलो वजन अधिक घेतात आणि हमालीचे पैसे देखील शेतकऱ्यांकडून वसूल केले जात आहेत. आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत सहकारी संस्थांनी धान खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून सर्रास लूट केली जात आहे. वैरागड हे गाव गैरआदिवासी उपयोजन क्षेत्रात येत असल्याने येथील सेवा सहकारी संस्थेने जिल्हा फेडरेशनच्या मार्फतीने धान खरेदी केंद्र सुरू करावे. आरमोरी तालुक्यातील देलनवाडी, कुरंडी (माल), दवंडी, विहीरगाव, मौशिखांब, वडसा तालुक्यातील पिंपळगाव येथे धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वैरागड गट ग्राम पंचायतीत समाविष्ट असलेले पाटणवाडा गावाचा समावेश पेसा अंतर्गत होते. कुरंडी (माल) या सहकारी संस्थेला पाटणवाडा गावाला जोडून आदिवासी विकास महामंडळाने पाटणवाड येथे धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी सूचना वैरागड संस्थेच्या काही सदस्यांंनी आमसभेत केली होती. मात्र याकडे संस्थेचे सचिव दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. देलनवाडी संस्थेमार्फत अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या पर्वावर या भागातील शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना धान विकावे लागत आहे.