शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

यांत्रिकीकरणामुळे दीडपट उत्पन्न वाढ

By admin | Updated: March 2, 2015 01:24 IST

जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामात यांत्रिकीकरणाचा वापर करीत असल्याने शेतकऱ्यांच्या वेळ, श्रम, पैशात बचत होत आहे.

कुरखेडा : जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामात यांत्रिकीकरणाचा वापर करीत असल्याने शेतकऱ्यांच्या वेळ, श्रम, पैशात बचत होत आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढत आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी मागील खरीप हंगामात धानाची रोवणी करतांना यंत्रांचा वापर करण्यात आला. यात शेतकऱ्यांना अधिक लाभ झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे धानाचे उत्पन्न दीड पटीने वाढले आहे. पंचायत समिती कृषी विभागाच्या सहकार्याने तालुक्यातील लेंढारी येथील नरेंद्र मातेरे हे शेतकरी मागील खरीप हंगामापासून यांत्रिकी पद्धतीने धानाची रोवणी करीत आहेत. त्यामुळे या पद्धतीचा त्यांना मोठा फायदा झाला आहे. उत्पन्नात वाढ झाली असून मजूर व इतर संसाधनात बचत झाली आहे. धानाची शेती करतांना ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीचा वापर केल्या जातो. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे श्रम, वेळ, पैसा वाया जात असतो. मात्र त्या तुलनेत उत्पादनात वाढ होत नाही. एकुण उत्पादनापेक्षा खर्च अधिक राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा वापर करावा, असे आवाहन पं. स. कृषी अधिकारी डफ यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)