शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पावसाअभावी धान राेवणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST

राेवणी करण्यासाठी सर्वप्रथम पऱ्हे टाकले जातात. हे पऱ्हे २० दिवसांच्या कालावधीत दुसऱ्या बांधीत राेवावे लागतात. त्यापेक्षा उशीर झाल्यास धानाच्या उत्पादनात घट हाेते. धानाचे पऱ्हे टाकल्याला आता २० दिवसांपेक्षा अधिक कालावधी हाेत चालला आहे. धानाच्या राेवणीसाठी शेतकऱ्यांनी शेत तयार करून ठेवले आहेत. मात्र पाऊस पडत नसल्याने राेवणीची कामे रखडली आहेत. 

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा, कडक उन्हामुळे पिकांना धाेका; मशागतीची कामे पूर्ण

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : धानाचे पऱ्हे राेवणी याेग्य झाली आहेत. मात्र पाऊस नसल्याने राेवणीची कामे रखडली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे. असेच शेतकरी धानाची राेवणी करीत असल्याचे दिसून येत आहे. गडचिराेली जिल्ह्यात सुमारे दाेन लाख हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. येथील अर्थव्यवस्था धानाच्या शेतीवर अवलंबून आहे. जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर धानाची राेवणी केली जाते, तर ५० हजार हेक्टर क्षेत्रावर आवत्या पद्धतीने धानाची लागवड केली जाते. राेवणी करण्यासाठी सर्वप्रथम पऱ्हे टाकले जातात. हे पऱ्हे २० दिवसांच्या कालावधीत दुसऱ्या बांधीत राेवावे लागतात. त्यापेक्षा उशीर झाल्यास धानाच्या उत्पादनात घट हाेते. धानाचे पऱ्हे टाकल्याला आता २० दिवसांपेक्षा अधिक कालावधी हाेत चालला आहे. धानाच्या राेवणीसाठी शेतकऱ्यांनी शेत तयार करून ठेवले आहेत. मात्र पाऊस पडत नसल्याने राेवणीची कामे रखडली आहेत. 

धानाची राेवणी उशिरा झाल्यास उत्पादनात घट हाेते. असा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी माझ्या शेतात सर्वाधिक आवत्याच टाकला आहे. कृषी विभाग धान लागवडीच्या नवनवीन पद्धती आणत आहे. त्याचा अवलंब करण्याची गरज आहे. पुढच्या वर्षी मी धानाची पेरणी करणार आहे. -नागेश दाेडके, शेतकरी

नायलाज म्हणून धानाची शेती करावी लागत आहे. दरवर्षीच पावसाचे विघ्न येतात. यावर्षी आता धानाचे पऱ्हे राेवण्याजाेेगे झाले आहेत. मात्र पाऊस नसल्याने राेवणीची कामे खाेळंबली आहेत. दमदार पाऊस पडल्यानंतर शेतकरी एकाचवेळी राेवणे सुरू करतात, अशावेळी मजुरी मिळत नाही. - रमेश उसेंडी, शेतकरी

कापसाचा पेरा वाढला- जिल्ह्यात दरवर्षी कापसाचा पेरा वाढत चालला आहे. साेयाबीनची जागा आता कापूस घेत आहे. ज्या जागेवर साेयाबीन लावले जात हाेते. त्या ठिकाणी आता कापसाची लागवड केली जात आहे. धानानंतर कापसाचा पेरा जिल्ह्यात सर्वाधिक आहे. 

सिंचन असलेल्यांचे कमी खर्चात राेवणेजिल्ह्यातील अत्यंत कमी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. विशेषकरून ज्या शेतकऱ्यांचे शेत वैनगंगा नदीला लागून आहे. अशाच शेतकऱ्यांकडे माेटरपंपची सुविधा आहे. अशाच शेतकऱ्यांचे धानाचे राेवणे सुरू आहेत. प्रत्येक गावात एक ते दाेनच शेतकऱ्यांकडे माेटरपंप आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे राेवणे सुरू नसल्याने अत्यंत कमी दरात मजूर उपलब्ध हाेत आहे. दमदार पाऊस सुरू झाल्यानंतर एकाचवेळी शेतकरी राेवणे सुरू करतात. त्यावेळी मजूर मिळत नाही.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती