शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
4
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
5
व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
7
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
8
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
9
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
10
बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
11
नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
12
Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
13
Aquarius Yearly Horoscope 2026: कुंभ राशीसाठी नवीन वर्ष 2026: आर्थिक चणचण संपणार! प्रवासातून भाग्योदय आणि सुखद बातम्यांचे वर्ष
14
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
15
Tiger Attack: वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
16
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
17
NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
18
दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
19
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
20
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी विहिरी रखडल्या

By admin | Updated: May 31, 2014 23:29 IST

शेतकर्‍यांना जलसिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने सिरोंचा तालुक्यात ४0 विहिरी बांधण्याला मंजुरी दिली असली तरी चार महिन्याचा कालावधी लोटूनही निधी प्राप्त

आनंद मांडवे - सिरोंचाशेतकर्‍यांना जलसिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने सिरोंचा तालुक्यात ४0 विहिरी बांधण्याला मंजुरी दिली असली तरी चार महिन्याचा कालावधी लोटूनही निधी प्राप्त झाला नसल्याने सदर विहिरींचे बांधकाम अपूर्ण आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ७८ टक्के जमीन जंगलांनी व्यापली आहे. या जमिनीवर मोठे सिंचन प्रकल्प बांधण्यास शासन परवानगी देत नाही. एवढेच नाही तर तलाव निर्मितीमध्येही पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होत असल्याने तलावांचे बांधकामही करून दिले जात नाही. त्याऐवजी शेतकर्‍यांना विहीर बांधून देण्यासाठी शासन प्राधान्य देत आहे. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत सिरोंचा तालुक्यात ४0 विहिरींच्या बांधकामाला चार महिन्यापूर्वी मंजुरी दिली. ज्या लाभार्थ्यांनी विहिरीसाठी अर्ज केला होता. अशा लाभार्थ्यांच्या शेत जमिनीमध्ये पाणी आहे किंवा नाही याची शहनिशा करण्याचे निर्देश सिंचाई विभागाने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला दिले. भूजल यंत्रणेने या बाबीची तपासणी करून सदर शेतकर्‍यांच्या जमिनीत पाणी असल्याबाबतचे प्रमाणपत्र ७ डिसेंबर २0१३ रोजी जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागाला सादर केले आहे. याच पत्राची एक प्रत सिरोंचा तहसीलदारांना पाठविण्यात आली आहे. तहसील कार्यालयाने सदर पत्र २४ फेब्रुवारी रोजी सिरोंचा येथील सिंचाई शाखेच्या शाखा अभियंत्यास अग्रेषित केले आहे. सदर पत्रात अविलंब अंदाजपत्रके तयार करून प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसाठी तहसील कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र चार महिन्याचा कालावधी लोटूनही यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. येत्या काही दिवसातच पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. पावसाळ्यामध्ये विहीर बांधणारे मजूर मिळत नाही. शेतात पीक राहत असल्याने विहिरीचे खोदकाम करणेसुद्धा अशक्य आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शेतीची कामे राहात नसल्याने सिरोंचा तालुक्यातील बहुतांश मजूर दुसर्‍या तालुक्यात किंवा सीमावर्तीय आंध्र प्रदेशात रोजगारासाठी स्थलांतरित होतात. ४0 विहिरींच्या बांधकामाला सुरूवात झाली असती तर उन्हाळ्यामध्ये बहुसंख्य मजुरांना रोजगार मिळाला असता. या रोजगारापासून मजुरांना वंचित राहावे लागले आहे. विहिरींचे बांधकाम झाले असते तर सदर शेतकर्‍यांना खरीप हंगामात सिंचनाची सुविधा निर्माण झाली असती. पुढील उन्हाळ्यात दुबार पीक घेण्यासाठीही मदत झाली असती. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे  या सर्व फायद्यांपासून वंचित राहावे लागले आहे. सिंचाई विभागाने सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर, गोल्लागुडम, वेन्नलाया, गुम्मलकोंडा, चिंतरेवूला, अंकिसा चक, आरडा, आदिमुत्तापूर, अमरादी, नारायणपूर, तमंदाला, राजेश्‍वरपल्ली चक, राजन्नापल्ली, लक्ष्मीदेवी पेठा, चिपूरदुब्बा व ब्राह्मणपल्ली या गावांमध्ये विहिरी मंजूर केल्या आहेत. यातील अनेक गावे दुर्गम क्षेत्रात मोडतात. विहिरींचे बांधकाम झाले असते तर शेतकर्‍यांना दुबार पीक घेता आले असते. त्यामुळे उत्पन्न वाढण्यास मदत झाली असती. सदर विहिरींच्या अंदाजपत्रकास मंजुरी देऊन तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.