शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

निधीअभावी विहिरी रखडल्या

By admin | Updated: May 31, 2014 23:29 IST

शेतकर्‍यांना जलसिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने सिरोंचा तालुक्यात ४0 विहिरी बांधण्याला मंजुरी दिली असली तरी चार महिन्याचा कालावधी लोटूनही निधी प्राप्त

आनंद मांडवे - सिरोंचाशेतकर्‍यांना जलसिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने सिरोंचा तालुक्यात ४0 विहिरी बांधण्याला मंजुरी दिली असली तरी चार महिन्याचा कालावधी लोटूनही निधी प्राप्त झाला नसल्याने सदर विहिरींचे बांधकाम अपूर्ण आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ७८ टक्के जमीन जंगलांनी व्यापली आहे. या जमिनीवर मोठे सिंचन प्रकल्प बांधण्यास शासन परवानगी देत नाही. एवढेच नाही तर तलाव निर्मितीमध्येही पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होत असल्याने तलावांचे बांधकामही करून दिले जात नाही. त्याऐवजी शेतकर्‍यांना विहीर बांधून देण्यासाठी शासन प्राधान्य देत आहे. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत सिरोंचा तालुक्यात ४0 विहिरींच्या बांधकामाला चार महिन्यापूर्वी मंजुरी दिली. ज्या लाभार्थ्यांनी विहिरीसाठी अर्ज केला होता. अशा लाभार्थ्यांच्या शेत जमिनीमध्ये पाणी आहे किंवा नाही याची शहनिशा करण्याचे निर्देश सिंचाई विभागाने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला दिले. भूजल यंत्रणेने या बाबीची तपासणी करून सदर शेतकर्‍यांच्या जमिनीत पाणी असल्याबाबतचे प्रमाणपत्र ७ डिसेंबर २0१३ रोजी जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागाला सादर केले आहे. याच पत्राची एक प्रत सिरोंचा तहसीलदारांना पाठविण्यात आली आहे. तहसील कार्यालयाने सदर पत्र २४ फेब्रुवारी रोजी सिरोंचा येथील सिंचाई शाखेच्या शाखा अभियंत्यास अग्रेषित केले आहे. सदर पत्रात अविलंब अंदाजपत्रके तयार करून प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसाठी तहसील कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र चार महिन्याचा कालावधी लोटूनही यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. येत्या काही दिवसातच पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. पावसाळ्यामध्ये विहीर बांधणारे मजूर मिळत नाही. शेतात पीक राहत असल्याने विहिरीचे खोदकाम करणेसुद्धा अशक्य आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शेतीची कामे राहात नसल्याने सिरोंचा तालुक्यातील बहुतांश मजूर दुसर्‍या तालुक्यात किंवा सीमावर्तीय आंध्र प्रदेशात रोजगारासाठी स्थलांतरित होतात. ४0 विहिरींच्या बांधकामाला सुरूवात झाली असती तर उन्हाळ्यामध्ये बहुसंख्य मजुरांना रोजगार मिळाला असता. या रोजगारापासून मजुरांना वंचित राहावे लागले आहे. विहिरींचे बांधकाम झाले असते तर सदर शेतकर्‍यांना खरीप हंगामात सिंचनाची सुविधा निर्माण झाली असती. पुढील उन्हाळ्यात दुबार पीक घेण्यासाठीही मदत झाली असती. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे  या सर्व फायद्यांपासून वंचित राहावे लागले आहे. सिंचाई विभागाने सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर, गोल्लागुडम, वेन्नलाया, गुम्मलकोंडा, चिंतरेवूला, अंकिसा चक, आरडा, आदिमुत्तापूर, अमरादी, नारायणपूर, तमंदाला, राजेश्‍वरपल्ली चक, राजन्नापल्ली, लक्ष्मीदेवी पेठा, चिपूरदुब्बा व ब्राह्मणपल्ली या गावांमध्ये विहिरी मंजूर केल्या आहेत. यातील अनेक गावे दुर्गम क्षेत्रात मोडतात. विहिरींचे बांधकाम झाले असते तर शेतकर्‍यांना दुबार पीक घेता आले असते. त्यामुळे उत्पन्न वाढण्यास मदत झाली असती. सदर विहिरींच्या अंदाजपत्रकास मंजुरी देऊन तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.