शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

अवैध अतिक्रमणामुळे वनजमिनीचे क्षेत्र होतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:09 IST

तालुक्याच्या बारसेवाडा, चंदनवेली तसेच जारावंडी, दोलंदा परिसरात वनजमिनीवर अतिक्रमण करून ही जमीन शेती कामासाठी वापरली जात आहे. काही ठिकाणी शेततळे व शेतबोडीसाठीही जंगल तोडून वनक्षेत्र कमी केले जात आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून वनजमिनीचे क्षेत्र कमी होत आहे.

ठळक मुद्देवनविभागाचा कानाडोळा : मौल्यवान वनसंपत्ती धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्याच्या बारसेवाडा, चंदनवेली तसेच जारावंडी, दोलंदा परिसरात वनजमिनीवर अतिक्रमण करून ही जमीन शेती कामासाठी वापरली जात आहे. काही ठिकाणी शेततळे व शेतबोडीसाठीही जंगल तोडून वनक्षेत्र कमी केले जात आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून वनजमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. मात्र या प्रकाराकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.एटापल्ली तालुका हा घनदाट जंगलांनी व्यापलेला असून वर्षभर वनजमिनीवर अतिक्रमण केले जात आहे. अनेक शेतकरी आपल्या शेतालगतच्या जंगलातील झाडे तोडून आपले शेतजमिनीचे क्षेत्र वाढवत आहे. पूर्वी झाडाची साल काढून झाडाला मारले जात होते. त्यानंतर उभ्या झाडाच्या मुळाला आगही लावले जात होते. झाडाला आग लावल्यावर त्या झाडाचा लाकूड सुद्धा उपयोगात येत नाही. ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलॅन्ड यासारख्या आधुनिक यंत्राचा वापर करून एटापल्ली तालुक्यात वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.जारावंडी-दोलंदा मार्गावर शेतजमीन वाहनासाठी सुद्धा मोठमोठी झाडे तोडले जात आहे. अनेक ठिकाणच्या वनजमिनीवर शेततळे खोदल्या जात असल्याने त्या ठिकाणची झाडे तोडल्या जात आहेत. बरेच शेतकरी वनजमिनीवर अतिक्रमण करतात. मात्र त्या जागेवर कोणत्याही पिकाची लागवड करीत नाहीत. अतिक्रमणामुळे जंगलातील मौल्यवान झाडे नष्ट होत असून जंगल धोक्यात सापडले आहे. वनविभागाने यावर ठोस उपाययोजना करून घनदाट जंगल वाचवावे, अशी मागणी काही सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणforestजंगल