शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अवैध अतिक्रमणामुळे वनजमिनीचे क्षेत्र होतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:09 IST

तालुक्याच्या बारसेवाडा, चंदनवेली तसेच जारावंडी, दोलंदा परिसरात वनजमिनीवर अतिक्रमण करून ही जमीन शेती कामासाठी वापरली जात आहे. काही ठिकाणी शेततळे व शेतबोडीसाठीही जंगल तोडून वनक्षेत्र कमी केले जात आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून वनजमिनीचे क्षेत्र कमी होत आहे.

ठळक मुद्देवनविभागाचा कानाडोळा : मौल्यवान वनसंपत्ती धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्याच्या बारसेवाडा, चंदनवेली तसेच जारावंडी, दोलंदा परिसरात वनजमिनीवर अतिक्रमण करून ही जमीन शेती कामासाठी वापरली जात आहे. काही ठिकाणी शेततळे व शेतबोडीसाठीही जंगल तोडून वनक्षेत्र कमी केले जात आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून वनजमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. मात्र या प्रकाराकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.एटापल्ली तालुका हा घनदाट जंगलांनी व्यापलेला असून वर्षभर वनजमिनीवर अतिक्रमण केले जात आहे. अनेक शेतकरी आपल्या शेतालगतच्या जंगलातील झाडे तोडून आपले शेतजमिनीचे क्षेत्र वाढवत आहे. पूर्वी झाडाची साल काढून झाडाला मारले जात होते. त्यानंतर उभ्या झाडाच्या मुळाला आगही लावले जात होते. झाडाला आग लावल्यावर त्या झाडाचा लाकूड सुद्धा उपयोगात येत नाही. ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलॅन्ड यासारख्या आधुनिक यंत्राचा वापर करून एटापल्ली तालुक्यात वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.जारावंडी-दोलंदा मार्गावर शेतजमीन वाहनासाठी सुद्धा मोठमोठी झाडे तोडले जात आहे. अनेक ठिकाणच्या वनजमिनीवर शेततळे खोदल्या जात असल्याने त्या ठिकाणची झाडे तोडल्या जात आहेत. बरेच शेतकरी वनजमिनीवर अतिक्रमण करतात. मात्र त्या जागेवर कोणत्याही पिकाची लागवड करीत नाहीत. अतिक्रमणामुळे जंगलातील मौल्यवान झाडे नष्ट होत असून जंगल धोक्यात सापडले आहे. वनविभागाने यावर ठोस उपाययोजना करून घनदाट जंगल वाचवावे, अशी मागणी काही सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणforestजंगल