रेगडी जलाशयाची व्यथा : दुरूस्तीकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्षंघोट : चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरात रेगडी येथे एकमेव कन्नमवार जलाशय आहे. सध्या या जलाशयाची पाळ खचली असून मुख्य कालव्याची दूरवस्था झाली आहे. मात्र रेगडी जलाशयाच्या मुख्य कालव्याच्या दुरूस्तीकडे सिंचाई विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. रेगडी येथील कन्नमवार जलाशयातून घोट, चामोर्शी, भेंडाळा आदी परिसरातील गावातील शेत जमिनीला पाणी पुरवठा केला जातो. जलाशयाच्या मुख्य कालव्याद्वारे दरवर्षी धानपिकाला पाणी पुरवठा केला जातो. पाण्याच्या प्रवाहामुळे सदर मुख्य कालवा दरवर्षी खचत जातो. परिणामी या कालव्याची दूरवस्था झाली आहे. जलाशयाची पाळसुध्दा जागोजागी खचलेली आहे. त्यामुळे जलाशयाचा आकार वाढत आहे. दमदार पाऊस व अतिवृष्टी झाल्यास कन्नमवार जलाशयाची पाळ फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जलाशयाची पाळ व मुख्य कालव्याच्या दुरूस्तीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते. मात्र शासन दुरूस्तीकरिता निधी उपलब्ध करून देत नसल्याने या कालव्याच्या दुरूस्तीचे काम थंडबस्त्यात आहे. परिणामी या भागातील सिंचन सुविधा प्रभावित होत आहे. (वार्ताहर)रेगडी जलाशयात ८१.४५ टक्के जलसाठासद्य:स्थितीत रेगडी येथील कन्नमवार जलाशयात ८१.४५ टक्के जलसाठा असून ५५.०१ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. या जलाशयातील पाण्याची पातळी २२९.७२ मीटर आहे. १ जुलैपासून या ठिकाणी ५४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी रेगडी येथे ५८ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती येथील सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
मुख्य कालव्याची प्रचंड दुरवस्था
By admin | Updated: July 20, 2015 01:44 IST