शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सद्भावनेमुळेच वाढतेय जिल्हा बँकेची प्रतिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST

दीप टंडन म्हणाल्या, कमीत कमी चुका करत जास्तीत जास्त जलद सेवा देण्याचे कसब जिल्हा बँकेने साध्य केले आहे. त्यामुळेच ही बँक रिझर्व्ह बँकेकडून आयएफएससी कोड पाटकावणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा बँक ठरली. बँकेची सेवा भविष्यात अधिक ग्राहकोपयोगी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सीईओ सतीश आयलवार यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा सांगितला.

ठळक मुद्देप्रंचित पोरेड्डीवार : वर्धापन दिनी ज्येष्ठ खातेदारांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजपर्यंत जिल्ह्यातील साडेचार लाख लोकांना आपल्याशी जोडले. विविध ग्राहकोपयोगी सेवेसोबतच बँकेने खातेदारांबद्दल जपलेली सद्भावना यामुळेच या बँकेची चांगली प्रतिमा तयार झाली असून ही प्रतिमा दिवसेंदिवस आणखी उजळेल, असा विश्वास गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी व्यक्त केला.बँकेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित खातेदारांचा मेळावा व सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमाला एचएसबीसी बँकेच्या माजी उपाध्यक्ष दीपा टंडन (कोलकाता), बँकेचे संचालक तथा माजी उपाध्यक्ष डॉ.बळवंत लाकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार प्रामुख्याने उपस्थित होते.दीप टंडन म्हणाल्या, कमीत कमी चुका करत जास्तीत जास्त जलद सेवा देण्याचे कसब जिल्हा बँकेने साध्य केले आहे. त्यामुळेच ही बँक रिझर्व्ह बँकेकडून आयएफएससी कोड पाटकावणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा बँक ठरली. बँकेची सेवा भविष्यात अधिक ग्राहकोपयोगी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सीईओ सतीश आयलवार यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा सांगितला. काही ज्येष्ठ ग्राहकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सेवानिवृत्त झालेल्या व बँकेचे पगारदार खातेधारक असलेल्या विविध क्षेत्रातील आठ लोकांचा सपत्निक शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यात भास्कर रामटेके, नरेशचंद्र कोडापे, श्यामराव अवखरे, कल्पना भोयर, सुधाकर तुमराम, प्रकाश गाठे, रामदास टिकले व कमलाकर बांगरे आदींचा समावेश होता.- तर उलाढाल पोहोचणार ५ हजार कोटींवरयावेळी मार्गदर्शन करताना बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले, जिल्हा बँकेने शेतकरी, महिला बचत गटांसह युवकांसाठी मोबाईल बँकिंग, सुवर्णतारण अशा विविध समाज घटकांसाठी सेवा देणे सुरू केले. ग्राहकांच्या विश्वासामुळेच बँकेची प्रगती होत आहे. पण आम्ही अजूनही परिपूर्ण झालो असे समजत नाही. आता ३ हजार कोटींच्या व्यवसायाचा पल्ला गाठत असलेली ही बँक याच गतीने वाटचाल करत राहिल्यास पुढील पाच वर्षात ५ हजार कोटींचा पल्ला गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :bankबँक