शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पुरामुळे मार्ग बंद

By admin | Updated: September 9, 2014 00:21 IST

सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ६०.१४ मिमीच्या सरासरीने ७३१.७ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यातील चार मार्गाची वाहतूक सोमवारी

६०.१४ मिमी पाऊस : भामरागडचा संपर्क तुटलेलाचगडचिरोली : सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ६०.१४ मिमीच्या सरासरीने ७३१.७ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यातील चार मार्गाची वाहतूक सोमवारी दुपारपर्यंत ठप्पच होती. या पावसामुळे मुलचेरा तालुक्यातील गोमणी गावात ४३ घरांची पडझड झाली आहे. येथील ४६ कुटुंबाना सुंदरनगर येथे हलविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गडचिरोली तालुक्यात ९३.६, धानोरा तालुक्यात १३४, चामोर्शी तालुक्यात ६०, मुलचेरा तालुक्यात ३१, देसाईगंज तालुक्यात १०५.३, आरमोरी तालुक्यात ६७, कुरखेडा तालुक्यात ९०, कोरची तालुक्यात १२.४, अहेरी तालुक्यात ३२.२, एटापल्ली तालुक्यात ३३.६, भामरागडमध्ये ३७, सिरोंचा येथे २५.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कठाणी नदीला पूर आल्यामुळे गडचिरोली-नागपूर मार्गावरची वाहतूक रविवारच्या संध्याकाळपासून सोमवारी दुपारपर्यंत बंदच होती. त्यानंतर दुपारी ३ वाजता गडचिरोली-चंद्रपूर मार्ग खुला झाला. वैरागड-देलनवाडी मार्गही बंद झाला आहे. बोलेपल्ली मार्ग बंद झाला असून भामरागड-आलापल्ली मार्गावरची वाहतूक बंदच आहे. भामरागड तालुक्यातील १०० वर अधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे. दिना नदीचा पूर ओसरल्याने आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरू झाली. या संततधार पावसामुळे चामोशी तालुक्यात १७५ घरांची पडझड झाली आहे. या पडझडीत ७ लाख २० हजार ४८० रूपयाचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. येनापूर सर्कलमध्ये ६० घर पडले असून १ लाख ५० हजार ७८० रूपयाचे नुकसान झाले. घोट सर्कलमध्ये ६१ घरांची पडझड झाली असून २ लाख ३७ हजार ७०० रूपयाचे नुकसान झाले आहे. आष्टी सर्कलमध्ये ६ घरांची पडझड झाली असून ३६ हजाराची नुकसान आहे. चामोर्शी सर्कलमध्ये ३० घरांची पडझड झाली आहे. येथे १ लाख १८ हजाराचे नुकसान झाले. कुनघाडा सर्कलमध्ये १८ घरांची पडझड झाली आहे. तेथे ७८ हजार ६८० रूपयाचे नुकसान झाले आहे. या सर्व पडझडीचा पंचनामा तलाठ्यांनी केला असून चामोर्शी तहसील प्रशासनाला याबाबतचा अहवाल देण्यात आला आहे. अहेरी येथील बेघर कॉलनी वार्ड क्रमांक ४ मधील नंदू झाडे यांच्या घरावरचे छत अतिवृष्टीमुळे उडाल्याने त्यांचे घरातील सामान पूर्णत: भिजले आहे. अहेरीचे तलाठी जल्लेवार यांनी मोक्कापंचनामा केला असून १ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. संततधार पावसामुळे अहेरीचा विद्युत पुरवठा ३२ तास बंद होता. तो सोमवारी पहाटे ३ वाजता पूर्ववत सुरू झाला. अहेरीतील काही भागातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलन केले. यावेळी सरपंच गंगाराम कोडापे, सदस्य शैलेश पटवर्धन, नायब तहसीलदार किरमे, आत्राम यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या व नुकसानाबाबत सर्व्हे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील अनेक मार्ग खुले झाले. त्यामुळे काही भागातील वाहतूक सुरळीत झाली. परंतु वैनगंगा नदीला अलेल्या पुराचा दाब कायम होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)