शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

दुष्काळातही व्हॉल्वमधून पाण्याचा अपव्यय सुरूच

By admin | Updated: April 18, 2016 03:57 IST

मागील वर्षीच्या पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ६० ते ७० टक्केच पाऊस झाला. याचा परिणाम मार्च

चामोर्शी/वैरागड : मागील वर्षीच्या पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ६० ते ७० टक्केच पाऊस झाला. याचा परिणाम मार्च महिन्यापासूनच दिसायला लागला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी सरासरीच्या जवळपास एक मीटरने पहिल्यांदाच खोल गेली आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र पाणी पुरवठा योजनांच्या व्हॉल्वमधून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे पाणी टंचाईची समस्या गंभीर होणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक आहे व पाण्याचा उपसा मात्र कमी आहे. त्यामुळे भूजल पातळी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मे व जून या महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा सुरू होतात. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे. काही गावांना पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जातो. पाईपलाईनला धोका होऊ नये, यासाठी नदी ते पाण्याची टाकी यांच्यादरम्यान व्हॉल्व बसविण्यात येतात. मात्र हे व्हॉल्व फिट बसत नसल्याने यामधून पाण्याचा अपव्यय होतो. जिल्हाभरात अशा प्रकारचे शेकडो व्हॉल्व दिसून येतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)वैरागडात पाण्याचा अपव्यय४वैरागड गावाला पाणी पुरवठा करणारी जुनीच योजना आहे. वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन या गावासाठी नवीन पाणी पुरवठा योजना तयार करण्याचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. मात्र अजुनपर्यंत याला मान्यता मिळाली नाही. कमी पाण्यामुळे गावात पाणी टंचाई आहे. मात्र नदी ते पाण्याची टाकी यादरम्यानच्या व्हॉल्वमधून पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देणे गरजेचे आहे.गौरीपूर ग्रा.पं.चे दुर्लक्ष४चामोर्शी तालुक्यातील गौरीपूर ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत नळ योजना बांधून देण्यात आली आहे. पाणी पुरवठा करणारी टाकी वालसरा गावाजवळील नाल्यावर बांधण्यात आली आहे. या नाल्यापासून भिवापूर मुख्य रस्त्यालगत पाईपलाईनवरील व्हॉल्व लिकेज आहे. दिवसभरातून हजारो लिटर पाणी या व्हॉल्वमधून रात्रंदिवस गळत राहते. या पाण्याचा उपयोग भिवापूर येथील नागरिक करीत आहेत. या लिकेजमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे गौरीपूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. गावात मात्र कमी पाणी पुरवठा होत असल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र दिसून येते.