शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

पावसाला उशीर झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

By admin | Updated: June 21, 2014 23:58 IST

जून महिना संपण्याच्या मार्गावर असतांनाही दमदार पावसाने अजूनपर्यंत बऱ्याच भागात हजेरी लावली नसल्याने पेरणीची कामे ठप्प पडली आहेत. पेरणीला उशीर झाल्यास उत्पादनात घट होण्याची

गडचिरोली : जून महिना संपण्याच्या मार्गावर असतांनाही दमदार पावसाने अजूनपर्यंत बऱ्याच भागात हजेरी लावली नसल्याने पेरणीची कामे ठप्प पडली आहेत. पेरणीला उशीर झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरीवर्गाची चिंता वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रात जून महिन्याच्या अगदी सुरूवातीलाच मान्सून दाखल होतो. विदर्भात मात्र मान्सून दाखल होण्यास जूनचा पहिला आठवडा किंवा दुसरा आठवडा लागतो. जवळपास दुसऱ्या आठवड्यापासून दमदार पावसाला सुरूवात होत असल्याने शेतकरीवर्ग विविध पिकांची पेरणी करतात. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यापाठोपाठ सोयाबीन, तूर, कपासी यासारख्या पिकांचेही बऱ्यापैकी उत्पादन घेतले जाते. या सर्व पिकांची पेरणी करण्यासाठी मोठा पाऊस होऊन तण उगवणे आवश्यक आहे. तण उगविल्यानंतर पेरणी केल्यास तण नष्ट होत असल्याने बियाणांची उगवण क्षमता वाढून तण काढण्याचा खर्चही कमी होतो. त्याचबरोबर उत्पादनातही चांगली वाढ होते. पहिला पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून पेरणीच्या कामांना सुरूवात होते. यावर्षी मात्र १७ जून रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास पडलेला पाऊस वगळता एकही दिवस मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात ओलावाही नाही. तण उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी बियाणांच्या पेरणीला अजूनपर्यंत सुरूवात केली नाही. धान पिकासाठी मोठ्या प्रमाणात जलसिंचनाची आवश्यकता भासते. त्यामुळे पावसाचे प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे. यावर्षी पाऊस कमी पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्याची प्रचिती आता यायला लागली आहे. अजूनपर्यंत मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. उशीरा पाऊस आल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता जास्त राहते. मागील वर्षी मुसळधार पावसाने अनेकांच्या शेतात व घरात पाणी शिरले होते. हजारो हेक्टर शेतीतील पीक वाहून गेले होते. मागील वर्षीचे कर्ज शेतकऱ्यांच्या डोक्यावर असतांना यावर्षीही पाऊस दगा देण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. (नगर प्रतिनिधी)