शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

आवक घटल्याने भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी नोव्हेंबर ते मे या कालावधीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. या कालावधीत कीड कमी प्रमाणात लागते. त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी येतो. तसेच धान निघाल्यानंतर त्याच ठिकाणी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. पावसाळ्यात मात्र पावसामुळे भाजीपाल्याची झाडे जगू शकत नाही. तसेच जास्त प्रमाणात कीड लागत असल्याने वेळोवेळी फवारणी करावी लागते.

ठळक मुद्देजिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांवर मदार : टोमॅटो, कारले, वांगी, पत्ताकोबी, फुलकोबी, मिरची आदींचे भाव वाढले

दिगांबर जवादे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भाजीपाला उत्पादन जवळजवळ बंद झाले आहे. परिणामी नागपूरच्या ठोक बाजारपेठेतून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भाजीपाल्यावर गडचिरोलीकरांना विसंबून राहावे लागत आहे. नागपूरच्या बाजारपेठेत भाव वाढल्याने त्याचा थेट परिणाम गडचिरोली जिल्ह्यातील भाज्यांच्या किमतीवर झाला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी नोव्हेंबर ते मे या कालावधीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. या कालावधीत कीड कमी प्रमाणात लागते. त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी येतो. तसेच धान निघाल्यानंतर त्याच ठिकाणी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. पावसाळ्यात मात्र पावसामुळे भाजीपाल्याची झाडे जगू शकत नाही. तसेच जास्त प्रमाणात कीड लागत असल्याने वेळोवेळी फवारणी करावी लागते. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी पावसाळ्यात भाजीपाल्याचे उत्पादन घेत नाही. सद्यस्थितीत नागपूर येथून येणाऱ्या भाजीपाल्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. नागपूर बाजारपेठेतून दर दिवशी गडचिरोली येथील गुजरीत मालवाहू वाहनांनी भाजीपाला आणला जातो. नागपुरात भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम गडचिरोली जिल्ह्यातील भाजीपाला दरावर झाला. लॉकडाऊन आधीच्या तुलनेत ५० टक्के भाव वाढले आहेत.टोमॅटोचे दर झाले दुप्पटटोमॅटो हा भाजीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळभर टोमॅटो २० ते ४० रूपये दराने उपलब्ध होत होते. मात्र मागील १५ दिवसांपासून टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाली आहे. सुमारे ७० ते ८० रूपये किलो दराने टोमॅटो खरेदी करावे लागत आहेत.भेंडी थोडी सावरलीगडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भेंडीचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी भेंडीसाठी हवामान चांगले असल्याने मोठ्या प्रमाणात भेंडीचे उत्पादन झाले. त्यामुळे लॉकडाऊनपूर्वी आणि नंतरही काही दिवस १० ते १५ रूपये किलो दराने शेतकरी शहरात फिरून भेंडीची विक्री करीत होते. आता मात्र शेतकऱ्यांची भेंडी निघणे बंद झाल्याने भेंडीचे भाव वाढले असून ३० रूपयाला किलो दराने विकली जात आहे.लिंबाचे भाव घसरलेपावसाळ्यात लिंबू मोठ्या प्रमाणात लागतात. तसेच पावसाळ्यातील लिंबूचा आकारसुद्धा मोठा राहते. त्यामुळे इतर भाजीपाला महाग झाला असताना लिंबू मात्र स्वस्त झाले आहेत. पूर्वी १० रूपयाला दोन किंवा तीनच लिंबू दिले जात होते. आता मात्र दहा रूपयाला पाच ते सहा लिंबू दिले जात आहेत. लोंच टाकण्यासाठी लिंबू खरेदी केले जातात.

टॅग्स :vegetableभाज्या