शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

आवक घटल्याने भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी नोव्हेंबर ते मे या कालावधीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. या कालावधीत कीड कमी प्रमाणात लागते. त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी येतो. तसेच धान निघाल्यानंतर त्याच ठिकाणी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. पावसाळ्यात मात्र पावसामुळे भाजीपाल्याची झाडे जगू शकत नाही. तसेच जास्त प्रमाणात कीड लागत असल्याने वेळोवेळी फवारणी करावी लागते.

ठळक मुद्देजिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांवर मदार : टोमॅटो, कारले, वांगी, पत्ताकोबी, फुलकोबी, मिरची आदींचे भाव वाढले

दिगांबर जवादे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भाजीपाला उत्पादन जवळजवळ बंद झाले आहे. परिणामी नागपूरच्या ठोक बाजारपेठेतून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भाजीपाल्यावर गडचिरोलीकरांना विसंबून राहावे लागत आहे. नागपूरच्या बाजारपेठेत भाव वाढल्याने त्याचा थेट परिणाम गडचिरोली जिल्ह्यातील भाज्यांच्या किमतीवर झाला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी नोव्हेंबर ते मे या कालावधीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. या कालावधीत कीड कमी प्रमाणात लागते. त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी येतो. तसेच धान निघाल्यानंतर त्याच ठिकाणी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. पावसाळ्यात मात्र पावसामुळे भाजीपाल्याची झाडे जगू शकत नाही. तसेच जास्त प्रमाणात कीड लागत असल्याने वेळोवेळी फवारणी करावी लागते. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी पावसाळ्यात भाजीपाल्याचे उत्पादन घेत नाही. सद्यस्थितीत नागपूर येथून येणाऱ्या भाजीपाल्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. नागपूर बाजारपेठेतून दर दिवशी गडचिरोली येथील गुजरीत मालवाहू वाहनांनी भाजीपाला आणला जातो. नागपुरात भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम गडचिरोली जिल्ह्यातील भाजीपाला दरावर झाला. लॉकडाऊन आधीच्या तुलनेत ५० टक्के भाव वाढले आहेत.टोमॅटोचे दर झाले दुप्पटटोमॅटो हा भाजीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळभर टोमॅटो २० ते ४० रूपये दराने उपलब्ध होत होते. मात्र मागील १५ दिवसांपासून टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाली आहे. सुमारे ७० ते ८० रूपये किलो दराने टोमॅटो खरेदी करावे लागत आहेत.भेंडी थोडी सावरलीगडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भेंडीचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी भेंडीसाठी हवामान चांगले असल्याने मोठ्या प्रमाणात भेंडीचे उत्पादन झाले. त्यामुळे लॉकडाऊनपूर्वी आणि नंतरही काही दिवस १० ते १५ रूपये किलो दराने शेतकरी शहरात फिरून भेंडीची विक्री करीत होते. आता मात्र शेतकऱ्यांची भेंडी निघणे बंद झाल्याने भेंडीचे भाव वाढले असून ३० रूपयाला किलो दराने विकली जात आहे.लिंबाचे भाव घसरलेपावसाळ्यात लिंबू मोठ्या प्रमाणात लागतात. तसेच पावसाळ्यातील लिंबूचा आकारसुद्धा मोठा राहते. त्यामुळे इतर भाजीपाला महाग झाला असताना लिंबू मात्र स्वस्त झाले आहेत. पूर्वी १० रूपयाला दोन किंवा तीनच लिंबू दिले जात होते. आता मात्र दहा रूपयाला पाच ते सहा लिंबू दिले जात आहेत. लोंच टाकण्यासाठी लिंबू खरेदी केले जातात.

टॅग्स :vegetableभाज्या