शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आवक घटल्याने भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी नोव्हेंबर ते मे या कालावधीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. या कालावधीत कीड कमी प्रमाणात लागते. त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी येतो. तसेच धान निघाल्यानंतर त्याच ठिकाणी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. पावसाळ्यात मात्र पावसामुळे भाजीपाल्याची झाडे जगू शकत नाही. तसेच जास्त प्रमाणात कीड लागत असल्याने वेळोवेळी फवारणी करावी लागते.

ठळक मुद्देजिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांवर मदार : टोमॅटो, कारले, वांगी, पत्ताकोबी, फुलकोबी, मिरची आदींचे भाव वाढले

दिगांबर जवादे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भाजीपाला उत्पादन जवळजवळ बंद झाले आहे. परिणामी नागपूरच्या ठोक बाजारपेठेतून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भाजीपाल्यावर गडचिरोलीकरांना विसंबून राहावे लागत आहे. नागपूरच्या बाजारपेठेत भाव वाढल्याने त्याचा थेट परिणाम गडचिरोली जिल्ह्यातील भाज्यांच्या किमतीवर झाला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी नोव्हेंबर ते मे या कालावधीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. या कालावधीत कीड कमी प्रमाणात लागते. त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी येतो. तसेच धान निघाल्यानंतर त्याच ठिकाणी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. पावसाळ्यात मात्र पावसामुळे भाजीपाल्याची झाडे जगू शकत नाही. तसेच जास्त प्रमाणात कीड लागत असल्याने वेळोवेळी फवारणी करावी लागते. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी पावसाळ्यात भाजीपाल्याचे उत्पादन घेत नाही. सद्यस्थितीत नागपूर येथून येणाऱ्या भाजीपाल्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. नागपूर बाजारपेठेतून दर दिवशी गडचिरोली येथील गुजरीत मालवाहू वाहनांनी भाजीपाला आणला जातो. नागपुरात भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम गडचिरोली जिल्ह्यातील भाजीपाला दरावर झाला. लॉकडाऊन आधीच्या तुलनेत ५० टक्के भाव वाढले आहेत.टोमॅटोचे दर झाले दुप्पटटोमॅटो हा भाजीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळभर टोमॅटो २० ते ४० रूपये दराने उपलब्ध होत होते. मात्र मागील १५ दिवसांपासून टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाली आहे. सुमारे ७० ते ८० रूपये किलो दराने टोमॅटो खरेदी करावे लागत आहेत.भेंडी थोडी सावरलीगडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भेंडीचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी भेंडीसाठी हवामान चांगले असल्याने मोठ्या प्रमाणात भेंडीचे उत्पादन झाले. त्यामुळे लॉकडाऊनपूर्वी आणि नंतरही काही दिवस १० ते १५ रूपये किलो दराने शेतकरी शहरात फिरून भेंडीची विक्री करीत होते. आता मात्र शेतकऱ्यांची भेंडी निघणे बंद झाल्याने भेंडीचे भाव वाढले असून ३० रूपयाला किलो दराने विकली जात आहे.लिंबाचे भाव घसरलेपावसाळ्यात लिंबू मोठ्या प्रमाणात लागतात. तसेच पावसाळ्यातील लिंबूचा आकारसुद्धा मोठा राहते. त्यामुळे इतर भाजीपाला महाग झाला असताना लिंबू मात्र स्वस्त झाले आहेत. पूर्वी १० रूपयाला दोन किंवा तीनच लिंबू दिले जात होते. आता मात्र दहा रूपयाला पाच ते सहा लिंबू दिले जात आहेत. लोंच टाकण्यासाठी लिंबू खरेदी केले जातात.

टॅग्स :vegetableभाज्या