शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी धान रोवणीची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:41 IST

मागील आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे बांध्यांमधील पाणी आटले असून रोवणीची कामे खोळंबली आहेत. कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

ठळक मुद्देआठ दिवसांपासून पावसाने घेतली उसंत : चामोर्शी तालुक्यात ७० टक्के रोवणीची कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : मागील आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे बांध्यांमधील पाणी आटले असून रोवणीची कामे खोळंबली आहेत. कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.पुणर्वसू नक्षत्रातील पावसामुळे धान रोवणीच्या कामांना वेग आला होता. त्यानंतर पाऊस पडत होता. मात्र पावसाची केवळ रिपझिप सुरू होती. मोठा पाऊस झाला नाही. सखल भागातील बांध्यांमध्ये पाणी जमा झाले. शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर मात्र आता पावसाने मागील आठ दिवसांपासून दडी मारली आहे. बांध्यांमधील पाणी आटल्याने रोवणीची कामे थांबली आहेत. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरीच रोवणीची कामे करीत आहेत.रोवणी करायच्या बांधित पाणी आहे. मात्र पऱ्याला पाणी नाही, असे शेतकरी सुखा परा खोदत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी शेतात इंजिन लावून पाणी देत आहेत. अजूनपर्यंत रोवणीची कामे पूर्ण झाली नाहीत. केवळ ७० टक्के रोवणी आटोपली आहेत. तलाव, बोड्या अर्धवट भरून आहेत. अश्लेषा नक्षत्राला ३ आॅगस्टपासून सुरुवात होत आहे. या नक्षत्रात पाऊस झाल्यास उर्वरित रोवणीची कामे सुरू होण्याची शक्यता आहे. बहुतांश शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्यावरच शेती अवलंबून आहे. धानपिकाला शेवटपर्यंत पाणी द्यावे लागत असल्याने धानाचे पूर्ण उत्पादन होण्यासाठी तलाव, बोड्या भरणे आवश्यक आहे. अन्यथा पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे.कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडाचामोर्शी तालुक्यातील बहुतांश शेतीला रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी उपलब्ध होते. जवळपास ४० किमी अंतरापर्यंतची शेती सिंचित होते. पावसाने उसंत घेतल्याने रोवणीची कामे खोळंबली आहेत. परिणामी कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडल्याशिवाय पर्याय नाही. सिंचन विभागाने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सिंचन क्षेत्राचा विस्तार मोठा असल्याने तलावातून पाणी सोडल्यानंतर शेवटच्या शेतकऱ्यांला पाणी उपलब्ध होण्यास आठ पेक्षा अधिक दिवसांचा कालावधी लागतो. कन्नमवार जलाशय ६० टक्केपेक्षा अधिक भरले आहे. पावसाळा अजून शिल्लक आहे. या कालावधीत पाऊस होऊन तलाव पूर्णपणे भरेल. रोवणीसाठी पाणी आवश्यक असल्याने पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. याबाबत संबंधित गावातील शेतकऱ्यांनी सिंचन विभागाकडे याबाबत मागणी सुध्दा केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती