शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

पावसाअभावी धान रोवणीची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:41 IST

मागील आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे बांध्यांमधील पाणी आटले असून रोवणीची कामे खोळंबली आहेत. कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

ठळक मुद्देआठ दिवसांपासून पावसाने घेतली उसंत : चामोर्शी तालुक्यात ७० टक्के रोवणीची कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : मागील आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे बांध्यांमधील पाणी आटले असून रोवणीची कामे खोळंबली आहेत. कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.पुणर्वसू नक्षत्रातील पावसामुळे धान रोवणीच्या कामांना वेग आला होता. त्यानंतर पाऊस पडत होता. मात्र पावसाची केवळ रिपझिप सुरू होती. मोठा पाऊस झाला नाही. सखल भागातील बांध्यांमध्ये पाणी जमा झाले. शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर मात्र आता पावसाने मागील आठ दिवसांपासून दडी मारली आहे. बांध्यांमधील पाणी आटल्याने रोवणीची कामे थांबली आहेत. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरीच रोवणीची कामे करीत आहेत.रोवणी करायच्या बांधित पाणी आहे. मात्र पऱ्याला पाणी नाही, असे शेतकरी सुखा परा खोदत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी शेतात इंजिन लावून पाणी देत आहेत. अजूनपर्यंत रोवणीची कामे पूर्ण झाली नाहीत. केवळ ७० टक्के रोवणी आटोपली आहेत. तलाव, बोड्या अर्धवट भरून आहेत. अश्लेषा नक्षत्राला ३ आॅगस्टपासून सुरुवात होत आहे. या नक्षत्रात पाऊस झाल्यास उर्वरित रोवणीची कामे सुरू होण्याची शक्यता आहे. बहुतांश शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्यावरच शेती अवलंबून आहे. धानपिकाला शेवटपर्यंत पाणी द्यावे लागत असल्याने धानाचे पूर्ण उत्पादन होण्यासाठी तलाव, बोड्या भरणे आवश्यक आहे. अन्यथा पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे.कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडाचामोर्शी तालुक्यातील बहुतांश शेतीला रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी उपलब्ध होते. जवळपास ४० किमी अंतरापर्यंतची शेती सिंचित होते. पावसाने उसंत घेतल्याने रोवणीची कामे खोळंबली आहेत. परिणामी कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडल्याशिवाय पर्याय नाही. सिंचन विभागाने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सिंचन क्षेत्राचा विस्तार मोठा असल्याने तलावातून पाणी सोडल्यानंतर शेवटच्या शेतकऱ्यांला पाणी उपलब्ध होण्यास आठ पेक्षा अधिक दिवसांचा कालावधी लागतो. कन्नमवार जलाशय ६० टक्केपेक्षा अधिक भरले आहे. पावसाळा अजून शिल्लक आहे. या कालावधीत पाऊस होऊन तलाव पूर्णपणे भरेल. रोवणीसाठी पाणी आवश्यक असल्याने पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. याबाबत संबंधित गावातील शेतकऱ्यांनी सिंचन विभागाकडे याबाबत मागणी सुध्दा केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती