शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

अनाथाला नाथ बनविण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

उच्च शिक्षित असलेल्या टिकले दाम्पत्याच्या संसारवेलीवर एक फूल उमलले होते. मात्र वर्षभरातच ते गळून पडले. यामुळे खचून न जाता मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी एक लहान मुलगा दत्तक घेतला. त्याचे नाव आयुष ठेवले. प्रा. कालिदास टिकले हे कढोली येथील तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक तर विद्या टिकले या कुरखेडा येथील शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या.

ठळक मुद्देदत्तकपुत्र आयुष पुन्हा झाला अनाथ : टिकले दाम्पत्याच्या निधनाने हिरावला आसरा

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : प्रा. कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले (शेट्ट्ये) या दाम्पत्याने अनाथ असलेल्या आयुषला दवाखान्यातून दत्तक घेतले. त्यामुळे आयुषचे जीवन फुलायला लागले होते. मात्र टिकले दाम्पत्याचे देसाईगंज तालुक्यातील कसारी फाट्याजवळ कार अपघातात निधन झाले. त्यामुळे दत्तकपूत्र आयुषला पुन्हा अनाथाचे जीवन जगावे लागणार आहे. तसेच अनाथ असलेल्या आयुषला नाथ (मोठे ) बनविण्याचे टिकले दाम्पत्याने बघितलेले स्वप्न अपुरेच राहिले.उच्च शिक्षित असलेल्या टिकले दाम्पत्याच्या संसारवेलीवर एक फूल उमलले होते. मात्र वर्षभरातच ते गळून पडले. यामुळे खचून न जाता मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी एक लहान मुलगा दत्तक घेतला. त्याचे नाव आयुष ठेवले. प्रा. कालिदास टिकले हे कढोली येथील तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक तर विद्या टिकले या कुरखेडा येथील शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. दोघेही पगारदार असल्याने लाखो रूपये वेतन घरी येत होते. लहानपणी अनाथाचे जीवन जगलेल्या आयुषच्या जीवनात सुख नांदायला लागले. आयुषला पोटच्या पोराप्रमाणे टिकले दाम्पत्याने जीव लावला होता. आयुषला खुप मोठे बनविण्याचे स्वप्न टिकले दाम्पत्याने बघितले होते. आयुष हा नागपूर येथे नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर टिकले दाम्पत्य नागपूर येथेच स्थायीक होणार होते. तसेच आयुषला चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन त्याला मोठे करायचे होते. एका अनाथ बालकाला टिकले दाम्पत्याने आश्रय देऊन त्याला नाथ बनविण्याचा ध्यास घेतला होता. मात्र नियतीला हे मान्य नसावे. गुरूवारी टिकले दाम्पत्य कुरखेडावरून देसाईगंजकडे जात होते. दरम्यान त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात टिकले दाम्पत्याचे निधन झाले. त्यामुळे या दाम्पत्याने आयुषबाबत बघितलेले स्वप्न अपुरेच राहिले. आयुष हा केवळ १५ वर्षांचा आहे. जगाच्या व्यवहारात अजून रूढायचा आहे. अशा स्थितीत त्याचा असरा असलले दोघेही निघून गेल्याने आयुषचा पुढील प्रवास कष्टप्रद होणार आहे.प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळविली नोकरीप्रा.कालिदास टिकले हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत त्यांनी शिक्षण घेतले व प्राध्यापक पदाचीही नोकरी अतिशय परिश्रमाने मिळविली. आपण जो त्रास भोगला तो त्रास आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये, असे प्रा.कालिदास टिकले यांचे स्वप्न होते. मात्र निधनामुळे त्यांचे हे स्वप्नही अपुरेच राहिले. त्यांच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी उसळली होती.