शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

अनाथाला नाथ बनविण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

उच्च शिक्षित असलेल्या टिकले दाम्पत्याच्या संसारवेलीवर एक फूल उमलले होते. मात्र वर्षभरातच ते गळून पडले. यामुळे खचून न जाता मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी एक लहान मुलगा दत्तक घेतला. त्याचे नाव आयुष ठेवले. प्रा. कालिदास टिकले हे कढोली येथील तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक तर विद्या टिकले या कुरखेडा येथील शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या.

ठळक मुद्देदत्तकपुत्र आयुष पुन्हा झाला अनाथ : टिकले दाम्पत्याच्या निधनाने हिरावला आसरा

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : प्रा. कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले (शेट्ट्ये) या दाम्पत्याने अनाथ असलेल्या आयुषला दवाखान्यातून दत्तक घेतले. त्यामुळे आयुषचे जीवन फुलायला लागले होते. मात्र टिकले दाम्पत्याचे देसाईगंज तालुक्यातील कसारी फाट्याजवळ कार अपघातात निधन झाले. त्यामुळे दत्तकपूत्र आयुषला पुन्हा अनाथाचे जीवन जगावे लागणार आहे. तसेच अनाथ असलेल्या आयुषला नाथ (मोठे ) बनविण्याचे टिकले दाम्पत्याने बघितलेले स्वप्न अपुरेच राहिले.उच्च शिक्षित असलेल्या टिकले दाम्पत्याच्या संसारवेलीवर एक फूल उमलले होते. मात्र वर्षभरातच ते गळून पडले. यामुळे खचून न जाता मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी एक लहान मुलगा दत्तक घेतला. त्याचे नाव आयुष ठेवले. प्रा. कालिदास टिकले हे कढोली येथील तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक तर विद्या टिकले या कुरखेडा येथील शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. दोघेही पगारदार असल्याने लाखो रूपये वेतन घरी येत होते. लहानपणी अनाथाचे जीवन जगलेल्या आयुषच्या जीवनात सुख नांदायला लागले. आयुषला पोटच्या पोराप्रमाणे टिकले दाम्पत्याने जीव लावला होता. आयुषला खुप मोठे बनविण्याचे स्वप्न टिकले दाम्पत्याने बघितले होते. आयुष हा नागपूर येथे नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर टिकले दाम्पत्य नागपूर येथेच स्थायीक होणार होते. तसेच आयुषला चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन त्याला मोठे करायचे होते. एका अनाथ बालकाला टिकले दाम्पत्याने आश्रय देऊन त्याला नाथ बनविण्याचा ध्यास घेतला होता. मात्र नियतीला हे मान्य नसावे. गुरूवारी टिकले दाम्पत्य कुरखेडावरून देसाईगंजकडे जात होते. दरम्यान त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात टिकले दाम्पत्याचे निधन झाले. त्यामुळे या दाम्पत्याने आयुषबाबत बघितलेले स्वप्न अपुरेच राहिले. आयुष हा केवळ १५ वर्षांचा आहे. जगाच्या व्यवहारात अजून रूढायचा आहे. अशा स्थितीत त्याचा असरा असलले दोघेही निघून गेल्याने आयुषचा पुढील प्रवास कष्टप्रद होणार आहे.प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळविली नोकरीप्रा.कालिदास टिकले हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत त्यांनी शिक्षण घेतले व प्राध्यापक पदाचीही नोकरी अतिशय परिश्रमाने मिळविली. आपण जो त्रास भोगला तो त्रास आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये, असे प्रा.कालिदास टिकले यांचे स्वप्न होते. मात्र निधनामुळे त्यांचे हे स्वप्नही अपुरेच राहिले. त्यांच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी उसळली होती.