शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

डॉ. अभय बंग जेआरडी टाटा अवॉर्डने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 19:49 IST

पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या ५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.राणी आणि डॉ.अभय बंग या दाम्पत्याला २८ फेब्रुवारीला लोकसेवेसाठी ‘जेआरडी टाटा अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देगांधी आणि गडचिरोलीकर माझ्यासाठी दोन विद्यापीठे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मनुष्याचे जीवनमान झपाट्याने बदलत आहे. यामध्ये तग धरण्यासाठी गांधींनी सांगितलेली ‘आरोग्य स्वराज’ ही संकल्पना नव्याने समजून घेणे आवश्यक आहे. विचारांची शिकवण देणारे गांधी आणि या विचारकृतीला सामावून घेणारी गडचिरोलीची माणसे ही माझ्यासाठी दोन विद्यापीठे आहेत. त्यामुळे हा पुरस्कार गडचिरोलीच्या लोकांना समर्पित आहे, अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केली.पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या ५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.राणी आणि डॉ.अभय बंग या दाम्पत्याला २८ फेब्रुवारीला लोकसेवेसाठी ‘जेआरडी टाटा अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते व भावना पॉप्युलेशन फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक पूनम मुट्रेजा यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. या सोहळ्यात डॉ.बंग बोलत होते.यावेळी रतन टाटा म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी तरुणांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यासाठी युवांची सक्षम पिढी घडली पाहीजे. डॉ.बंग दाम्पत्य आरोग्यासोबतच सामाजिक भान असलेली युवा पिढी तयार करण्याचे काम अनेक वर्षांपासून करीत आहे. त्यामुळे लोकसेवेसाठी प्रथमच दिला जाणारा जेआरडी टाटा सन्मान या दोघांना देताना मला आनंद होत आहे. दिल्लीतील हिंसाचारात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करीत डॉ.राणी बंग म्हणाल्या, गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागात लोकांना अशाच दु:खाला सामोरे जावे लागते. त्यांचे दु:ख आम्ही आरोग्यसेवेच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न करीत असून हा पुरस्कार त्यांना व कार्यकर्त्यांना समर्पित आहे, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Abhay Bangअभय बंग