शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

ओपीडीत दुप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:42 IST

पावसाळ्याला सुरुवात हाेताच आजारांमध्ये वाढ हाेते. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक विहिरीचे पाणी पितात. ग्रामीण भागात पाणी शुद्धिकरणाची काेणतीही साेय ...

पावसाळ्याला सुरुवात हाेताच आजारांमध्ये वाढ हाेते. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक विहिरीचे पाणी पितात. ग्रामीण भागात पाणी शुद्धिकरणाची काेणतीही साेय नाही. त्यामुळे विहिरीचे जसेच्या तसे पाणी पिल्याशिवाय पर्याय राहत नाही. तसेच शेतावर जाणारे नागरिक काही वेळेवर नदी, नाल्याचे पाणी पितात. यामुळे डायरिया हाेण्याची शक्यता राहते. तसेच मध्यंतरी १५ दिवस पावसाने उसंत घेतली हाेती. त्यामुळे दमट वातावरण निर्माण हाेऊन डासांची पैदास वाढली हाेती. त्यामुळे जिल्हाभरातच मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रत्येकच रुग्णालयाच्या ओपीडीत तपासणी करणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुपटीने वाढली असल्याचे दिसून येते.

बाॅक्स...

मुलांची काेराेना चाचणी

सर्दी, ताप, खाेकला, आदी लक्षणे असलेला बालक उपचारासाठी रुग्णालयात आल्यास त्याची काेराेना तपासणी करण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. त्यामुळेच दरदिवशी जिल्हाभरात सरासरी ६०० काेराेना चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, काेराेनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

बाॅक्स...

डेंग्यू, मलेरियाची चाचणी

मलेरियाच्या बाबतीत गडचिराेली जिल्हा अतिशय संवेदनशील आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात मलेरियाचे रुग्ण अधिक राहतात. त्यामुळे तापाची लक्षणे घेऊन आलेल्या व्यक्तीची मलेरिया तपासणी केली जात आहे. काही रुग्णांची डेंग्यू तपासणीसुद्धा केली जात आहे.

बाॅक्स...

१०० खाटांच्या दवाखान्यात २५० रुग्ण भरती

गडचिराेली येथील महिला व बाल रुग्णालयाची क्षमता १०० खाटांची आहे. मात्र, सद्य:स्थितीत या रुग्णालयात जवळपास २५० रुग्ण उपचार घेत आहेत. बेड नसल्याने खाली गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहेत. यामध्ये प्रामुख्याने गराेदर माता, प्रसूती पश्चात माता व बालके, कुपाेषित मुले व १२ वर्षांपर्यंत इतर आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांचा समावेश आहे.

बाॅक्स...

ही काळजी घ्या

- पाणी उकळून प्यावे

- झाेपताना मच्छरदाणीचा वापर करावा

- जवळपास पाणी साचू देऊ नये

काेट...

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पाणी उकळूनच प्यावे. नदी, तलावामधील पाणी पिऊ नये. झाेपताना मच्छरदाणीचा वापर करावा. बालकाची तब्येत बिघडल्यास तत्काळ जवळपासच्या रुग्णालयात उपचारासाठी न्यावे.

- डाॅ. दीपचंद साेयाम, अधीक्षक महिला व बालरुग्णालय, गडचिराेली