शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

शहरी नक्षलवादाकडे दुर्लक्ष नको; शरद पवार यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 20:13 IST

Gadchiroli News सरकारविरुद्ध आकस निर्माण करून स्वत:साठी अनुकूल जनमत तयार करणारा एक वर्ग समाजात सक्रिय आहे. वेळीच काळजी घेऊन त्यांना नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी गडचिरोली येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

ठळक मुद्दे विकासाची प्रक्रिया गतिमान करणे गरजेचे

गडचिरोली / चंद्रपूर : राज्यात नक्षली कारवाया व त्यांचा प्रभाव कमी झाल्याचे वाटत असले तरी, शहरी नक्षलवादाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सरकारविरुद्ध आकस निर्माण करून स्वत:साठी अनुकूल जनमत तयार करणारा एक वर्ग समाजात सक्रिय आहे. वेळीच काळजी घेऊन त्यांना नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी गडचिरोली येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी तथा माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आ. धर्मरावबाबा आत्राम, जि. प.च्या माजी अध्यक्षा भाग्यश्री आत्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

पवार म्हणाले, विकासापासून वंचित असलेल्या समाजघटकाने नक्षलवादाला प्रतिसाद दिला आणि तो फोफावत गेला. त्यामुळे हा सामाजिक-आर्थिक विषय आहे. त्याला विकास हेच उत्तर आहे. विकासात्मक कामातील अडथळे रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी काम करावे. याशिवाय दळणवळणाची साधने वाढविणे गरजेचे आहे. मी मुख्यमंत्री असताना विशेष तरतूद करून बीआरओ (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन)च्या माध्यमातून या भागात रस्ते बनविले होते, याची आठवणही त्यांनी सांगितली.

शेती आणि औद्योगिकरणाला पाठबळ हवे

- विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी शेतीचा विकास आणि औद्योगिकरणाला पाठबळ देण्याची गरज आहे. नव्या पिढीमध्ये येत असलेले नैराश्य त्याने घालविता येईल, असे पवार म्हणाले.

- सुरजागड लोहखाणीसंदर्भात जे काही गैरसमज आहेत, ते चर्चेतून दूर केले पाहिजेत. संबंधित कंपनीच्या मालकांनी, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लोकांना समजावून सांगितले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

आम्हाला संघटनेसोबत सरकारही चालवायचे आहे

- काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी अलीकडेच विदर्भात राष्ट्रवादीचे दुकान बंद होईल, असे वक्तव्य केले. त्यावर बोलताना पवार म्हणाले, सोनियाजी दिल्लीत सर्व समविचारी पक्षांनी एकत्र राहावे अशी भूमिका व्यक्त करत असतात. त्याच्याशी सुसंगतपणे आम्ही वागत असतो. पक्ष वाढविण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण आम्ही पक्ष चालवत असताना राज्याचे सरकारही चालवायचे आहे याचे भान ठेवतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दंगलीमागे देशाची सूत्र सांभाळणारी विचारधारा

अमरावती, नांदेड व मालेगावमध्ये अलीकडे झालेल्या जातीय दंगलीमागे देशाची सूत्र सांभाळणारी विचारधारा जबाबदार असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शनिवारी मूल येथे गुरुवारी आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार