शहरं
Join us  
Trending Stories
1
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
2
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
3
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
4
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
5
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
6
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
7
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
8
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
9
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
10
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
11
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
12
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
13
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
14
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
15
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
16
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
17
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
18
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
19
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
20
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चव्हेला धरण भागात माती परीक्षण करू नका

By admin | Updated: May 29, 2014 02:21 IST

आंध्रप्रदेश शासनाद्वारा वैनगंगा नदीवर चपराळानजीक होऊ घातलेल्या चव्हेला धरणास आष्टी नजीकच्या कुनघाडा माल येथील नागरिकांनी तीव्र विरोध

आष्टी : आंध्रप्रदेश शासनाद्वारा वैनगंगा नदीवर चपराळानजीक होऊ घातलेल्या चव्हेला धरणास आष्टी नजीकच्या कुनघाडा माल येथील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला असून महाराष्ट्र शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय माती परीक्षण करू नये, अशी मागणी कुनघाडा मालवासीयांनी २७ मे रोजी आष्टी येथे आयोजित सभेत केली.

सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सिद्धार्थ खंडारे होते. यावेळी नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, चंद्रपूर येथील पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बारापात्रे, आंध्रप्रदेशचे उपकार्यकारी अभियंता o्रीनिवास रेड्डी उपस्थित होते. तेलंगणा क्षेत्रातील सिंचन व पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी आंध्रप्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील वर्धा-वैनगंगा नदीवर चपराळा गावाच्या विरूद्ध बाजूला तुमडी या गावात आंध्रप्रदेश शासनाकडून ३८ हजार ५00 कोटी रूपये खर्च करून प्राणहिता नदीवर प्राणहिता चव्हेला धरण उभारण्यात येत आहे. या धरणाच्या भिंतीचे दरवाजे १५२ मीटर ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ४ गावांना व त्याच परिसरातील ५ हजार २५0 एकर शेतीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे चपराळा अभयारण्य, चपराळा तीर्थक्षेत्र, ईल्लुर, ठाकरी, कुनघाडा यासोबतच काही गावांना फटका बसणार आहे.

या बंधार्‍यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढून आष्टीचा काही भाग देखील प्रभावीत होणार आहे. त्याहूनही धरणाची उंची खूप असल्याने पावसाळ्यातील पाणी येथे साठविल्या जाणार आहे. धरणाच्या ठिकाणी ७0 फुट खोल व १00 फुट रूंद कालवा तयार करून पावसाळ्यानंतर तिथे साचविलेले पूर्ण पाणी हैद्राबादपर्यंत नेण्यात येणार आहे. यामुळे पावसाळ्यानंतर प्राणहिता नदी कोरडी होईल. चपराळापासून तर आवलमरी, व्यंकटापूरपर्यंत पाणीटंचाई निर्माण होणार आहे. यामुळे मासेमारी, सिंचनावर प्रतिकुल परिणाम होईल. पाण्याचे भिषण संकट उभे राहणार असल्याने नागरिक व जनावरांनादेखील पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

चव्हेला प्रकल्पामुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना कोणताच फायदा होणार नाही. मात्र नुकसान होणार आहे. अनेक गावे चव्हेला प्रकल्पाच्या पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेश शासनाने कुनघाडा माल येथे पूर्वपरवानगीशिवाय माती परीक्षणासाठी बोअर मारण्यास सुरूवात केली आहे. यामुळे गावकर्‍यांनी त्याला विरोध केला आहे. अधिकार्‍यांनी महाराष्ट्र शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय माती परीक्षण करू नये, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे. या धरणाच्या कामाला दोनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यापूर्वीच विरोध केला असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदनही दिले होते. परंतु त्याचा काहीही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. (वार्ताहर)