शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
3
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
4
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
5
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
6
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
7
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
8
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
9
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
10
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
11
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
12
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
13
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
14
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
15
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
16
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
17
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
18
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
19
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक

जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के झाल्याशिवाय पाेलीस भरती घेऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के झाल्याशिवाय पाेलीस भरती घेऊ नका, अशी मागणी काॅंग्रेसव ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के झाल्याशिवाय पाेलीस भरती घेऊ नका, अशी मागणी काॅंग्रेसव व युवक काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अहेरी येथे कार्यक्रमासाठी जिल्ह्यात आले असता, काॅंग्रेस व युवक काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात, गडचिराेली हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जाते. परंतु जिल्ह्यात ४२ टक्केच्यावर गैरआदिवासी आहेत. तरी सुद्धा ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून सहा टक्क्यावर आणण्यात आले. त्यामुळे ओबीसी युवकांवर अन्याय झाला आहे. जिल्ह्यात पाेलीस भरती करायची असल्यास ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करावे, त्यानंतरच पदभरती करावी, ज्याप्रमाणे राज्यात मराठा आरक्षणाचा विषय सुरू असतानाच त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवून पदभरती करण्याचा निर्णय शासनाने केला असला तरी राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसी आरक्षण कमी करण्यात आले आहे, त्या जिल्ह्यातील ओबीसी युवकांवर पाेलीस भरतीमध्ये माेठा अन्याय हाेणार आहे.

राज्यातील आठ जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९९७ पासून १९ टक्क्यावरून ६ ते ९ टक्क्यावर आणून ओबीसींच्या संविधानिक हक्काची पायमल्ली केली आहे. गडचिराेली जिल्ह्यात ६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे गडचिराेलीसह राज्याच्या इतर जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करूनच राज्यभर पाेलीस भरती प्रक्रिया राबवावी, अन्यथा आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत माेटघरे, नंदू वाईलकर, गाैरव येनप्रेड्डीवार यांनी दिला.