शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

नगरपंचायत नको, नगरपरिषदच द्या

By admin | Updated: May 24, 2014 23:37 IST

शासनाने चामोर्शी शहरास नगरपंचायतीचा दर्जा देऊन एक महिन्याच्या आत आक्षेप नोंदविण्याचे पत्र ग्रामपंचायतीला पाठविले आहे. मात्र चामोर्शीला नगर पंचायतीचा दर्जा न

ा्रामपंचायत पदाधिकार्‍यांची मागणी; ग्रा. पं. ने केला ठरावही पारित

चामोर्शी : शासनाने चामोर्शी शहरास नगरपंचायतीचा दर्जा देऊन एक महिन्याच्या आत आक्षेप नोंदविण्याचे पत्र ग्रामपंचायतीला पाठविले आहे. मात्र चामोर्शीला नगर पंचायतीचा दर्जा न देता नगर परिषदेचा दर्जा द्यावा, अशी मागणी आयोजित पत्रकार परिषदेत ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी केली.

चामोर्शी शहराची लोकसंख्या सध्या २५ हजारापेक्षा अधिक आहे. शहराच्या सर्वांगीन विकासासाठी नगर परिषद होणे अत्यंत आवश्यक आहे. नगर पंचायत व ग्रामपंचायतीस विकासासाठी सारखाच निधी मिळतो. मात्र नगर परिषदेला केंद्र, राज्य व नगर विकास खात्याकडून भरमसाठ विकास निधी मिळवून घेता येतो. यातून शहराचा सर्वांगीन विकास करणे शक्य होते. यामुळे शासनाने चामोर्शी शहरास नगर परिषदेचा दर्जा द्यावा, अशी मागणी पदाधिकार्‍यांनी यावेळी केली. शासनाने चामोर्शी शहरास नगर पंचायतीचा दर्जा देऊन ग्रा. पं. पदाधिकारी, सदस्य व गावकर्‍यांची दुधावरची तहान ताकावर भागवू नये, अशीही भावना पदाधिकार्‍यांनी यावेळी व्यक्त केली.

नगर परिषदेचा दर्जा देण्याच्या मागणीचा ठराव ग्रामसभेत पारीत करण्यात आला असून या ठरावाची प्रत शासन व प्रशासनास पाठविण्यात आली असल्याचेही यावेळी पदाधिकार्‍यांनी सांगितले. नगर परिषदेचा दर्जा मिळविण्यासाठी ग्रा. पं. पदाधिकारी ग्रामस्थांना घेऊन अविरत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचाही निर्धार पदाधिकार्‍यांनी यावेळी बोलून दाखविला.

पत्रकार परिषदेला सरपंच मालन बोदलकर, उपसरपंच नागोबा पिपरे, ग्रा. पं. सदस्य राहुल नैताम, सुमेध तुरे, विजय शातलवार, मधुकर गेडाम, अविनाश चौधरी, सोपान नैताम, हिरामण भाकरे उपस्थित आदी होते. (शहर प्रतिनिधी)