शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
5
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
6
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
8
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
9
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
10
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
11
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
12
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
13
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
14
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
15
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
16
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
17
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
18
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
19
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
20
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले

तेलंगणाची सीमा बंद करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:33 IST

राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊन व संचारबंदीतून गडचिरोली जिल्ह्याला पूर्णतः वगळून वीकेंड लॉकडाऊन कायम ठेवावे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, दैनंदिन काम ...

राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊन व संचारबंदीतून गडचिरोली जिल्ह्याला पूर्णतः वगळून वीकेंड लॉकडाऊन कायम ठेवावे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, दैनंदिन काम करणारे कामगार, गोरगरीब मजूर वर्ग व लहान, मोठे व्यापारी वर्ग आणि शेतकरी, शेतमजुरांना दिलासा देण्याची मागणी. गडचिरोली जिल्ह्यात कोरोना संसर्ग मागील वर्षीपासूनच नियंत्रणात आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा संसर्गाचे प्रमाण इतर जिल्ह्यांपेक्षा कमी आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने लागू केलेल्या संपूर्ण लॉकडाऊन व संचारबंदीतूनच उद्योगविरहित या जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनता, मजूर व लहान, मोठे व्यापारी, शेतकरी आणि शेतमजूर हे सावरले नसून, जिल्ह्यातील ८० टक्के लोक आजही आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. राज्य सरकार व जिल्हा प्रशासन या जिल्ह्यावर परत संपूर्ण लाॅकडाऊन व संचारबंदी लादल्यास जिल्ह्यातील समस्त जनतेला याचा फटका बसणार असून, रोजंदारी गरीब मजूर वर्गाला उपासमारीलाही सामोरे जाण्याची पाळी येणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. उद्योगविरहित या जिल्ह्यातील कामगार व मजूरवर्गात अठराविश्वे दारिद्र्य आजही कायम आहेत. कामगारवर्ग व रोजंदारी मजुरांची आर्थिक स्थिती भयावह असून, दैनंदिन मजुरी करून पोट भरणाऱ्या हजारो कुटुंबीयांसह आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेवटचा घटकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळे लाॅकडाऊन जाहीर करू नये, अशी मागणी रवी सल्लम यांनी केली आहे.