शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खरंच धान उत्पादकांना दिलासा मिळेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:16 IST

हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कृषीमंत्र्यांनी शेतकºयांना नापिकीसाठी राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाºया मदतीची घोषणा केली. खरं म्हणजे मदतीची नुसती घोषणाच करायची होती, प्रत्यक्ष लाभ लगेच द्यायचा नव्हता.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कृषीमंत्र्यांनी शेतकºयांना नापिकीसाठी राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाºया मदतीची घोषणा केली. खरं म्हणजे मदतीची नुसती घोषणाच करायची होती, प्रत्यक्ष लाभ लगेच द्यायचा नव्हता. तरीही त्या घोषणेसाठी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचा मुहूर्त निवडण्यात आला. म्हणजे घोषित केलेली मदत कमी आहे म्हणून ओरड करून सभागृहात हंगामा करण्याचा विरोधकांना चान्सच मिळणार नाही, अशी सत्ताधाºयांची चाल त्यांच्यासाठी निश्चितच सोयीची होती. मात्र हंगामा झाला नाही म्हणजे आपण जिंकलो किंवा सुटलो एकदाचे, असे समजण्याचे कारण नाही. ज्या मदतीची घोषणा केली ती खरोखरच शेतकºयांना दिलासा देणारी आहे का? त्याहीपेक्षा ती मदत मुळात शेतकºयांना खरोखरच मिळणार का? याचा सद्सद्विवेकबुद्धीने राज्यकर्त्यांनी विचार करण्याची गरज आहे.यावर्षी बोंडअळी, मावा, तुडतुड्याने विदर्भातल्या कापूस आणि धान उत्पादकांच्या तोंडचा घास पळविला. पाऊस कमी असतानाही पीक बºयापैकी होते. मात्र कीडींचा प्रादुर्भाव झाला आणि पाहता पाहता उभे पीक फस्त होऊ लागले. ज्या पीकाच्या भरोशावर वर्षभराची स्वप्नं रंगविली होती ती आपल्या डोळ्यासमोर धुळीस मिळत असल्याचे पाहून शेतकरी खचून गेला. महागड्या कीटकनाशकाची फवारणी करण्याची सोय नसतानाही अनेकांनी पैशाची जुळवाजुळव करून फवारणी केली, पण मुजोर कीड गेली नाही, उलट काही ठिकाणी फवारणीने माणसांचाच बळी घेतला. गडचिरोली जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी शेतांवर जाऊन पाहणी केली.तातडीने सर्व्हेक्षण करून शेतकºयांना मदत द्या, अशी गळ प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना केली. मात्र शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत बसलेल्या असंवेदनशिल प्रशासनाच्या नाकावरची माशीही हलली नाही. दिवाळी झाली, शेतातील धानाची कापणी होऊन मळणीही झाली. लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे पाहून हताश झालेला शेतकरी वर्ग शासकीय मदतीच्या एकमेव आशेवर नजर लाऊन बसला होता. अखेर ७ डिसेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू असताना शासनाने पीकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश दिला.शेतातल्या पीकाची कापणी आणि मळणी झाल्यावर पीकांच्या नुकसानीचे पंचानामे कसे करायचे? असा प्रश्न सर्वांना पडला. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. वरातीमागून घोडे चालविण्याचा हा प्रकार शेतकºयांसाठी कितपत फायद्याचा आहे हे माहीत नाही, पण शासनासाठी वेळ मारून नेण्यासाठी पुरेसा आहे. इतर पीकांच्या तुलनेत आधीच धानाच्या नुकसानीसाठी सर्वात कमी मदत मिळणार आहे. त्यातही पंचनाम्यात नुकसानीचे प्रमाण किती दाखविले जाते त्यावर मदतीचे प्रमाण अवलंबून राहणार आहे. त्यामुळे धान उत्पादकांना खरंच या मदतीमुळे दिलासा मिळेल का? हा प्रश्न कायम आहे.