शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
5
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
6
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
7
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
8
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
9
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
10
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
11
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
12
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
13
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
14
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
15
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
16
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
17
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
18
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
19
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
20
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट

खरंच धान उत्पादकांना दिलासा मिळेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:16 IST

हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कृषीमंत्र्यांनी शेतकºयांना नापिकीसाठी राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाºया मदतीची घोषणा केली. खरं म्हणजे मदतीची नुसती घोषणाच करायची होती, प्रत्यक्ष लाभ लगेच द्यायचा नव्हता.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कृषीमंत्र्यांनी शेतकºयांना नापिकीसाठी राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाºया मदतीची घोषणा केली. खरं म्हणजे मदतीची नुसती घोषणाच करायची होती, प्रत्यक्ष लाभ लगेच द्यायचा नव्हता. तरीही त्या घोषणेसाठी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचा मुहूर्त निवडण्यात आला. म्हणजे घोषित केलेली मदत कमी आहे म्हणून ओरड करून सभागृहात हंगामा करण्याचा विरोधकांना चान्सच मिळणार नाही, अशी सत्ताधाºयांची चाल त्यांच्यासाठी निश्चितच सोयीची होती. मात्र हंगामा झाला नाही म्हणजे आपण जिंकलो किंवा सुटलो एकदाचे, असे समजण्याचे कारण नाही. ज्या मदतीची घोषणा केली ती खरोखरच शेतकºयांना दिलासा देणारी आहे का? त्याहीपेक्षा ती मदत मुळात शेतकºयांना खरोखरच मिळणार का? याचा सद्सद्विवेकबुद्धीने राज्यकर्त्यांनी विचार करण्याची गरज आहे.यावर्षी बोंडअळी, मावा, तुडतुड्याने विदर्भातल्या कापूस आणि धान उत्पादकांच्या तोंडचा घास पळविला. पाऊस कमी असतानाही पीक बºयापैकी होते. मात्र कीडींचा प्रादुर्भाव झाला आणि पाहता पाहता उभे पीक फस्त होऊ लागले. ज्या पीकाच्या भरोशावर वर्षभराची स्वप्नं रंगविली होती ती आपल्या डोळ्यासमोर धुळीस मिळत असल्याचे पाहून शेतकरी खचून गेला. महागड्या कीटकनाशकाची फवारणी करण्याची सोय नसतानाही अनेकांनी पैशाची जुळवाजुळव करून फवारणी केली, पण मुजोर कीड गेली नाही, उलट काही ठिकाणी फवारणीने माणसांचाच बळी घेतला. गडचिरोली जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी शेतांवर जाऊन पाहणी केली.तातडीने सर्व्हेक्षण करून शेतकºयांना मदत द्या, अशी गळ प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना केली. मात्र शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत बसलेल्या असंवेदनशिल प्रशासनाच्या नाकावरची माशीही हलली नाही. दिवाळी झाली, शेतातील धानाची कापणी होऊन मळणीही झाली. लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे पाहून हताश झालेला शेतकरी वर्ग शासकीय मदतीच्या एकमेव आशेवर नजर लाऊन बसला होता. अखेर ७ डिसेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू असताना शासनाने पीकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश दिला.शेतातल्या पीकाची कापणी आणि मळणी झाल्यावर पीकांच्या नुकसानीचे पंचानामे कसे करायचे? असा प्रश्न सर्वांना पडला. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. वरातीमागून घोडे चालविण्याचा हा प्रकार शेतकºयांसाठी कितपत फायद्याचा आहे हे माहीत नाही, पण शासनासाठी वेळ मारून नेण्यासाठी पुरेसा आहे. इतर पीकांच्या तुलनेत आधीच धानाच्या नुकसानीसाठी सर्वात कमी मदत मिळणार आहे. त्यातही पंचनाम्यात नुकसानीचे प्रमाण किती दाखविले जाते त्यावर मदतीचे प्रमाण अवलंबून राहणार आहे. त्यामुळे धान उत्पादकांना खरंच या मदतीमुळे दिलासा मिळेल का? हा प्रश्न कायम आहे.