शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

रोवणी केलेल्या शेतजमिनीला पाण्याअभावी पडल्या भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 05:00 IST

तालुक्यातील बहुतांश भागात अजूनही रोवणीच्या कामास सुरुवात झाली नाही. काही शेतकरी आपल्या शेतालगतच्या नाल्यातील पाणी शेतात ऑइल इंजिनच्या साहाय्याने आणून कशीबशी रोवणी करीत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, ऊन-सावल्याचा खेळ सध्या सुरू आहे. तसेच आकाशात ढग दिसून येतात. अशा अवस्थेत शेतकरी पाण्याची आस धरून आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : जिल्ह्यात अजूनही सर्वदूर पाऊस नाहीच

लाेकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : तालुक्यातील सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी शेतात रोवणी केली. मात्र, रोवणी झाल्यानंतर पिकाला आवश्यक अधूनमधून पाणी मिळत नसल्याने रोवणी केलेल्या शेतजमिनीलाच भेगा पडत असून, धानपीक धाेक्यात आले आहे. आपल्याजवळील उपलब्ध पाण्याचा वापर करीत शेतकऱ्यांनी शेतात रोवणीचे काम केले. मात्र, पिकाला पाणी उपलब्ध नसल्याने रोवणी केलेले धानपीक वाढण्याऐवजी पाण्याअभावी वाढ खुंटून गेल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील बहुतांश भागात अजूनही रोवणीच्या कामास सुरुवात झाली नाही. काही शेतकरी आपल्या शेतालगतच्या नाल्यातील पाणी शेतात ऑइल इंजिनच्या साहाय्याने आणून कशीबशी रोवणी करीत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, ऊन-सावल्याचा खेळ सध्या सुरू आहे. तसेच आकाशात ढग दिसून येतात. अशा अवस्थेत शेतकरी पाण्याची आस धरून आहे. मात्र, वरुणराजाची अवकृपा दिसून येत असल्याने शेतकरी चिंतातुर झालेला दिसून येत आहे. रोवणी हंगाम सुरू असलेल्या कालावधीत शेत शिवारात अजूनही पाण्याचा साठा दिसून येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही शेतकऱ्यांचे धान पऱ्हे रोवणीलायक झाले आहेत. मात्र, पाण्याअभावी रोवणी काम रखडल्याचे दिसून येत आहे. शेतकरी रोवणी झाल्यावर वाढीसाठी रासायनिक खतांची मात्रा पिकाला देत असतात. अशा अवस्थेत धानपिकाच्या जमिनीत पाणी असणे आवश्यक असते. मात्र, काही शेतात टाकलेले खतसुद्धा विरघळले नसल्याने रासायनिक खत जसेच्या तसे दिसून येत आहे. त्यामुळे पाण्याअभावी खताचा खर्च वाया गेला आहे. 

लागवडीचा खर्च बसला माथ्यावर शेतजमीन नाल्याशेजारी असून, नाल्यातील साचलेल्या पाण्याचा उपयोग करून दहा दिवसांपूर्वी रोवणीचे काम पूर्ण केले. यासाठी १५ ते २० हजार चार एकर शेतीजमिनीला खर्च झाले आहेत, असे कान्हाेली येथील एका शेतकऱ्याने सांगितले. रोवणीनंतर पाऊस आला नाही. त्यामुळे पीक वाचवण्यासाठी मोठी अडचण होत असून, पीक हातून जाण्याचे संकेत दिसून येत आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस