शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

रोवणी केलेल्या शेतजमिनीला पाण्याअभावी पडल्या भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 05:00 IST

तालुक्यातील बहुतांश भागात अजूनही रोवणीच्या कामास सुरुवात झाली नाही. काही शेतकरी आपल्या शेतालगतच्या नाल्यातील पाणी शेतात ऑइल इंजिनच्या साहाय्याने आणून कशीबशी रोवणी करीत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, ऊन-सावल्याचा खेळ सध्या सुरू आहे. तसेच आकाशात ढग दिसून येतात. अशा अवस्थेत शेतकरी पाण्याची आस धरून आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : जिल्ह्यात अजूनही सर्वदूर पाऊस नाहीच

लाेकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : तालुक्यातील सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी शेतात रोवणी केली. मात्र, रोवणी झाल्यानंतर पिकाला आवश्यक अधूनमधून पाणी मिळत नसल्याने रोवणी केलेल्या शेतजमिनीलाच भेगा पडत असून, धानपीक धाेक्यात आले आहे. आपल्याजवळील उपलब्ध पाण्याचा वापर करीत शेतकऱ्यांनी शेतात रोवणीचे काम केले. मात्र, पिकाला पाणी उपलब्ध नसल्याने रोवणी केलेले धानपीक वाढण्याऐवजी पाण्याअभावी वाढ खुंटून गेल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील बहुतांश भागात अजूनही रोवणीच्या कामास सुरुवात झाली नाही. काही शेतकरी आपल्या शेतालगतच्या नाल्यातील पाणी शेतात ऑइल इंजिनच्या साहाय्याने आणून कशीबशी रोवणी करीत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, ऊन-सावल्याचा खेळ सध्या सुरू आहे. तसेच आकाशात ढग दिसून येतात. अशा अवस्थेत शेतकरी पाण्याची आस धरून आहे. मात्र, वरुणराजाची अवकृपा दिसून येत असल्याने शेतकरी चिंतातुर झालेला दिसून येत आहे. रोवणी हंगाम सुरू असलेल्या कालावधीत शेत शिवारात अजूनही पाण्याचा साठा दिसून येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही शेतकऱ्यांचे धान पऱ्हे रोवणीलायक झाले आहेत. मात्र, पाण्याअभावी रोवणी काम रखडल्याचे दिसून येत आहे. शेतकरी रोवणी झाल्यावर वाढीसाठी रासायनिक खतांची मात्रा पिकाला देत असतात. अशा अवस्थेत धानपिकाच्या जमिनीत पाणी असणे आवश्यक असते. मात्र, काही शेतात टाकलेले खतसुद्धा विरघळले नसल्याने रासायनिक खत जसेच्या तसे दिसून येत आहे. त्यामुळे पाण्याअभावी खताचा खर्च वाया गेला आहे. 

लागवडीचा खर्च बसला माथ्यावर शेतजमीन नाल्याशेजारी असून, नाल्यातील साचलेल्या पाण्याचा उपयोग करून दहा दिवसांपूर्वी रोवणीचे काम पूर्ण केले. यासाठी १५ ते २० हजार चार एकर शेतीजमिनीला खर्च झाले आहेत, असे कान्हाेली येथील एका शेतकऱ्याने सांगितले. रोवणीनंतर पाऊस आला नाही. त्यामुळे पीक वाचवण्यासाठी मोठी अडचण होत असून, पीक हातून जाण्याचे संकेत दिसून येत आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस