शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अतिवृष्टीने जिल्हा जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:26 IST

मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे मार्ग अडून जिल्ह्यातील दिडशेवर गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडलगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीचे नदीचे पाणी गावात शिरल्याने ३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

ठळक मुद्दे२४ तासात १२६.५ मिमी पाऊस : १० तालुके झाले जलमय, ३०० नागरिकांना हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे मार्ग अडून जिल्ह्यातील दिडशेवर गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडलगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीचे नदीचे पाणी गावात शिरल्याने ३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मंगळवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्ह्यात १२६.५ मिमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. भामरागड व मुलचेरा तालुक्यात २४ तासात अडीचशे मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद घेण्यात आली. बांध्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने धानाच्या रोवणीची कामे बंद पडली आहेत. ३१ जुलै रोजी सुध्दा जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.गडचिरोली-धानोरा मार्गावरील धानोरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या रांजीनाला गावाजवळील मुख्य मार्गावर सागाचे झाड कोसळले. सदर झाड दुसऱ्या बाजुला लटकून होते. त्यामुळे लहान वाहने ये-जा करीत होती. मात्र एसटी, ट्रक यासारखी मोठी वाहने जाऊ शकत नव्हती. त्यामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.तळोधी मो. : तळोधी ते पावीमुरांडा मार्गादरम्यान जोगना गावाजवळील नाल्यावरून सोमवारी सायंकाळपासून पाणी वाहात आहे. त्यामुळे या मार्गावरील सुमारे ३५ गावांचा संपर्क तुटला आहे. मुरमुरी, येडानूर, पांढरी भटाळ, लसनपेठ टोली, बानगुडा, लेनगुडा, ढेकणी या गावांचा समावेश आहे. ढेकणीसमोर मुतमुर नाल्यावर पाणी आहे. पुसेर गावाजवळून नाला वाहतो. या नाल्यावर पूल नाही. पावसाच्या पाण्याने नाला ओसंडून वाहत आहे. कुथेगाव-येडानूर दरम्यान रावनपल्ली गावाजवळ असलेल्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने याही गावांचा संपर्क तुटला आहे.सोमवारी गडअहेरी नाला, झुरी नाला, डुम्मे नाल्यावरील पुलांवर पाणी होते. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक मंगळवारी दुपारपर्यंत ठप्प होती. मंगळवारी दुपारी पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे नदी, नाल्यांच्या पुलावरील पाणी ओसरल्याने हे सर्व मार्ग मंगळवारी सायंकाळी सुरू झाले. मात्र आमगाव-विसापूर मार्गावरील पोहार नाल्यावर मंगळवारी सकाळी पाणी जमा झाले होते.पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी मासेमारी केली जात होती. गडचिरोली शहरातही ठिकठिकाणी जाळ टाकून मासे पकडले जात होते. पाऊस थांबल्याने आता रोवणीच्या कामांना वेग येणार आहे.भामरागड व मुलचेरात पावसाचा कहरगडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेले भामरागड हे तालुकास्थळ पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या तीन नद्यांनी वेढले आहे. भामरागड तालुक्यात सोमवारी सकाळपासून पावसाने कहर केला. या तालुक्यात एकाच दिवशी सुमारे २६८.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीवरील पुलावरून चार फूट पाणी वाहत होते. त्यामुळे भामरागडसह पलिकडील शेकडो गावे मंगळवारी संध्याकाळपर्यंत संपर्काबाहेर होते. गेल्या दोन दिवसांपासून भामरागडमधील नागरिकांचा उर्वरित जगाशी संपर्क तुटलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने पर्लकोटा नदीच्या पुराचा फटका बसणाºया २५० ते ३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. सॅटेलाईट फोनवरून तेथील पथकाशी संपर्क साधून परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे. मुलचेरा तालुक्यातही २४ तासात २७५ मिमी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे.अनेक ठिकाणचा वीज पुरवठा-मोबाईलही बंदभामरागडसह अनेक गावांचा वीज पुरवठा दोन दिवसांपासून खंडित झाला आहे. त्यामुळे मोबाईल टॉवरच्या बॅटरीही डिस्चार्ज होऊन त्या टॉवरने काम करणे बंद केले आहे. परिणामी मोबाईल-इंटरनेट सुविधाही ठप्प पडली आहे. त्यामुळे नागरिकांना कोणाशीच संपर्क करणे अशक्य होऊन मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात भामरागडचा अनेक वेळा संपर्क तुटतो. अशावेळी मोबाईल सेवा सुरू असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र बीएसएनएलचे अधिकारी त्याकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे एकदा मोबाईल टॉवर बंद झाल्यानंतर ते आपल्या सवडीप्रमाणे दुरूस्त करतात. त्यांना जिल्हा प्रशासनाने योग्य ते निर्देश देण्याची मागणी केली जात आहे. बीएसएनएल टॉवरचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने टॉवर बंद पडत असल्यास जनरेटरकरिता आपत्ती व्यवस्थापनच्या निधीतून तत्काळ डिझेलचा पुरवठा तहसीलदारांनी करून दूरसंचार सेवा सुरळीत करावी, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे देण्यात आले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर