शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

अतिवृष्टीने जिल्हा जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:26 IST

मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे मार्ग अडून जिल्ह्यातील दिडशेवर गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडलगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीचे नदीचे पाणी गावात शिरल्याने ३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

ठळक मुद्दे२४ तासात १२६.५ मिमी पाऊस : १० तालुके झाले जलमय, ३०० नागरिकांना हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे मार्ग अडून जिल्ह्यातील दिडशेवर गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडलगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीचे नदीचे पाणी गावात शिरल्याने ३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मंगळवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्ह्यात १२६.५ मिमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. भामरागड व मुलचेरा तालुक्यात २४ तासात अडीचशे मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद घेण्यात आली. बांध्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने धानाच्या रोवणीची कामे बंद पडली आहेत. ३१ जुलै रोजी सुध्दा जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.गडचिरोली-धानोरा मार्गावरील धानोरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या रांजीनाला गावाजवळील मुख्य मार्गावर सागाचे झाड कोसळले. सदर झाड दुसऱ्या बाजुला लटकून होते. त्यामुळे लहान वाहने ये-जा करीत होती. मात्र एसटी, ट्रक यासारखी मोठी वाहने जाऊ शकत नव्हती. त्यामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.तळोधी मो. : तळोधी ते पावीमुरांडा मार्गादरम्यान जोगना गावाजवळील नाल्यावरून सोमवारी सायंकाळपासून पाणी वाहात आहे. त्यामुळे या मार्गावरील सुमारे ३५ गावांचा संपर्क तुटला आहे. मुरमुरी, येडानूर, पांढरी भटाळ, लसनपेठ टोली, बानगुडा, लेनगुडा, ढेकणी या गावांचा समावेश आहे. ढेकणीसमोर मुतमुर नाल्यावर पाणी आहे. पुसेर गावाजवळून नाला वाहतो. या नाल्यावर पूल नाही. पावसाच्या पाण्याने नाला ओसंडून वाहत आहे. कुथेगाव-येडानूर दरम्यान रावनपल्ली गावाजवळ असलेल्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने याही गावांचा संपर्क तुटला आहे.सोमवारी गडअहेरी नाला, झुरी नाला, डुम्मे नाल्यावरील पुलांवर पाणी होते. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक मंगळवारी दुपारपर्यंत ठप्प होती. मंगळवारी दुपारी पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे नदी, नाल्यांच्या पुलावरील पाणी ओसरल्याने हे सर्व मार्ग मंगळवारी सायंकाळी सुरू झाले. मात्र आमगाव-विसापूर मार्गावरील पोहार नाल्यावर मंगळवारी सकाळी पाणी जमा झाले होते.पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी मासेमारी केली जात होती. गडचिरोली शहरातही ठिकठिकाणी जाळ टाकून मासे पकडले जात होते. पाऊस थांबल्याने आता रोवणीच्या कामांना वेग येणार आहे.भामरागड व मुलचेरात पावसाचा कहरगडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेले भामरागड हे तालुकास्थळ पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या तीन नद्यांनी वेढले आहे. भामरागड तालुक्यात सोमवारी सकाळपासून पावसाने कहर केला. या तालुक्यात एकाच दिवशी सुमारे २६८.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीवरील पुलावरून चार फूट पाणी वाहत होते. त्यामुळे भामरागडसह पलिकडील शेकडो गावे मंगळवारी संध्याकाळपर्यंत संपर्काबाहेर होते. गेल्या दोन दिवसांपासून भामरागडमधील नागरिकांचा उर्वरित जगाशी संपर्क तुटलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने पर्लकोटा नदीच्या पुराचा फटका बसणाºया २५० ते ३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. सॅटेलाईट फोनवरून तेथील पथकाशी संपर्क साधून परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे. मुलचेरा तालुक्यातही २४ तासात २७५ मिमी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे.अनेक ठिकाणचा वीज पुरवठा-मोबाईलही बंदभामरागडसह अनेक गावांचा वीज पुरवठा दोन दिवसांपासून खंडित झाला आहे. त्यामुळे मोबाईल टॉवरच्या बॅटरीही डिस्चार्ज होऊन त्या टॉवरने काम करणे बंद केले आहे. परिणामी मोबाईल-इंटरनेट सुविधाही ठप्प पडली आहे. त्यामुळे नागरिकांना कोणाशीच संपर्क करणे अशक्य होऊन मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात भामरागडचा अनेक वेळा संपर्क तुटतो. अशावेळी मोबाईल सेवा सुरू असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र बीएसएनएलचे अधिकारी त्याकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे एकदा मोबाईल टॉवर बंद झाल्यानंतर ते आपल्या सवडीप्रमाणे दुरूस्त करतात. त्यांना जिल्हा प्रशासनाने योग्य ते निर्देश देण्याची मागणी केली जात आहे. बीएसएनएल टॉवरचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने टॉवर बंद पडत असल्यास जनरेटरकरिता आपत्ती व्यवस्थापनच्या निधीतून तत्काळ डिझेलचा पुरवठा तहसीलदारांनी करून दूरसंचार सेवा सुरळीत करावी, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे देण्यात आले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर