शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

जिल्ह्यात पुन्हा मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:05 IST

गुरूवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा नदी, नाल्यांना पूर येण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. रात्री शहरात पाणी शिरण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

ठळक मुद्देभामरागडात शिरले पाणी : नदी, नाल्यांची पाणी पातळी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गुरूवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा नदी, नाल्यांना पूर येण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. रात्री शहरात पाणी शिरण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली आहे. बुधवारी व गुरूवारी दुपारी पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे नदी, नाल्यांच्या पाण्याची पातळी कमी झाली होती. मात्र पुन्हा गुरूवारी रात्रीपासून काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी नाल्यांची पातळी वाढण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. सतत पाऊस सुरू असल्याने रोवण्याच्या कामांवरही परिणाम झाला आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावरील कुमरगुडा नाल्याच्या पुलावर पूर वाहण्यास सुरूवात झाल्याने आलापल्ली-भामरागड मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. वैनगंगा नदी व तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.वीज पडून तीन महिला जखमीदेसाईगंज : रोवणीची काम करीत असताना वीज पडल्याने आमगाव येथील तीन महिला जखमी झाल्या. दुसऱ्या एका घटनेत देसाईगंज येथील दोन म्हशी ठार झाल्या. सुनिता मोहन चौधरी (३०), शकुंतला श्रावण चौधरी (५५), विशाखा महेश निकोडे सर्व रा. आमगाव अशी जखमींची नावे आहेत. आमागाव येथील महेश रामजी निकोडे यांच्या शेतात रोवणीचे काम सुरू होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान वीज कोसळली. यामध्ये तिघींनाही जबर झटका बसला. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय देसाईगंज येथे भरती करण्यात आले. पुढील उपचासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले आहे. त्याच वेळेला देसाईगंज येथील हनुमान वार्डातील रहिवासी शंकर मैंद यांच्या दोन म्हशींवर वीज कोसळल्याने ठार झाल्या. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर