शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना पालकमंत्र्यांकडून अन्नधान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 23:55 IST

अतिवृष्टीने संसार उद्ध्वस्त झालेल्या आलापल्ली येथील २०० कुटुंबांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडून एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य मदत म्हणून देण्यात आले.

ठळक मुद्दे२०० कुटुंबांना मदत : एक महिना पुरेल एवढे तांदूळ, डाळ व तेलाचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अतिवृष्टीने संसार उद्ध्वस्त झालेल्या आलापल्ली येथील २०० कुटुंबांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडून एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य मदत म्हणून देण्यात आले.चार दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. पुराचे पाणी अहेरी, आलापल्ली व ग्रामीण भागातील काही नागरिकांच्या घरामध्ये शिरले होते. अचानक पाण्याचा वेढा झाला. त्याचबरोबर पूर आला, त्या दिवशी रात्रंदिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे घरातील साहित्य बाहेर काढणे शक्य झाले नाही. परिणामी घरातील साहित्य व दैनंदिन वापराच्या वस्तू पुरामध्ये बुडाल्या. पाण्यामुळे अन्नधान्य खराब झाल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळणार असले तरी ही मदत मिळण्यासाठी बराच कालावधी आहे. पूरग्रस्त कुटुंब उपाशी राहू नये, ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी स्वखर्चातून आलापल्ली येथील पूरग्रस्तांना महिनाभर पुरेल एवढे तांदूळ, डाळ, तेल उपलब्ध वितरित केले. या मदतीमुळे सदर कुटुंबांना एक महिना सावरण्यास मदत होणार आहे.मदतीचे वितरण करतेवेळी अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, प्रकाश गुडेल्लीवार, भाजपा अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजपा युवा मोर्चा, जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, अहेरी शहर अध्यक्ष मुकेश नामेवार, आलापल्ली शहर अध्यक्ष नागेश रेड्डी, फिरोज शेख, सलिम शेख, सागर डेकाटे, विनोद ठाकरे, पप्पू मदिवार, शंकर मगडीवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, मालू तोडसाम, गुड्डू ठाकरे, संदीप गुमुलवार उपस्थित होते.

टॅग्स :ministerमंत्री