शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात युरियाचा तुटवडा

By admin | Updated: August 21, 2015 01:49 IST

चालू खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सुमारे २७ हजार ४०० मेट्रिक टन युरिया खताची मागणी राज्य शासनाकडे केले होते.

लोकमत विशेषगडचिरोली : चालू खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सुमारे २७ हजार ४०० मेट्रिक टन युरिया खताची मागणी राज्य शासनाकडे केले होते. त्यानुसार शासनाने २४ हजार ७०० मेट्रिक टन खत मंजूर केले होते. मात्र प्रत्यक्षात १५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्याला केवळ ११ हजार ६९० मेट्रिक टन खताचाच पुरवठा झाला आहे. शेतकऱ्यांनी खत मिळत नसल्याची ओरड सुरू केली आहे. रासायनिक खतांमध्ये मिश्र, संयुक्त व युरीया या खतांचा वापर पिकांसाठी केला जातो. मात्र यामध्ये युरीया खतावर सरकार सर्वाधिक अनुदान देत असल्याने या खताची किमत इतर खतांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग या खताचा वापर सर्वाधिक करीत असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांमध्ये युरीया खताचा वाटा सुमारे निम्मा आहे. गडचिरोली जिल्ह्याला एकूण ४४ हजार ५०० मेट्रिक टन खताची गरज भासते. यामध्ये युरीया खताची मागणी २४ हजार ७०० मेट्रिक टन एवढी आहे. चालू खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने शासनाकडे २७ हजार ४०० मेट्रिक टन खताची मागणी केली होती. मात्र त्यापैकी २४ हजार ७०० मेट्रिक खत मंजूर करण्यात आले. सर्वसाधारणपणे शासनाकडून खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर युरिया खताचा पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी अर्धा पावसाळा उलटूनही केवळ ११ हजार ६९० मेट्रिक खताचा पुरवठा झाला आहे. यातील बहुतांश खताची उचल शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे खताचे गोदाम आता रिकामे झाले आहेत. आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी रोवण्याच्या कामाला सुरुवात केली. रोवण्याबरोबर खत टाकण्यासाठी शेतकरीवर्ग कृषी केंद्र चालकांकडे जात आहे. मात्र युरिया खत उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी शेतकऱ्याला मिश्र व संयुक्त या महागड्या खतांचा वापर करण्याचा सल्लाही खत विक्रेत्यांकडून दिला जात आहे. खताचा पुरवठा नेमका कधी होईल याबाबत प्रशासन व व्यापारी सुद्धा अनभिज्ञ आहेत. पुरवठा लांबल्यास पिकांची वाढ खुंटू शकते, ही बाब लक्षात घेऊन अधिकचे पैसे मोजून शेतकरीवर्ग इतर खते खरेदी करीत आहेत. मात्र आर्थिक तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याने कृषी विभागाच्या कारभाराविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. (नगर प्रतिनिधी)लोकप्रतिनिधींचा दबाव आवश्यकयुरीया खताचा सर्वाधिक वापर शेतकरी जवळपास सप्टेंबर महिन्यात करतात. त्यामुळे या कालावधीत युरीया खताची प्रचंड मागणी वाढत असल्याचा अनुभव प्रत्येक जिल्ह्याच्या कृषी विभागाला आहे. त्यामुळे प्राप्त झालेला युरीया राजकीय दबाव वापरून आपापल्या जिल्ह्यात नेला जातो. ज्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी कमजोर त्या जिल्ह्यात युरीयाचा तुटवडा निर्माण होतो. ही समस्या गडचिरोली जिल्ह्याला उद्भवू नये यासाठी आमदार, खासदार व पालकमंत्र्यांचा दबाव असणे अत्यंत गरजेचे आहे.करार न झाल्याने खत मिळण्यास अडचणयुरियाचे उत्पादन करणारी कंपनी व जिल्ह्यातील खताचे व्यापारी यांच्यातील करार संपला होता. सदर करार होण्यास उशीर लागला. त्यामुळे जिल्ह्यात युरियाचा पुरवठा होण्यास उशीर झाला आहे. यानंतर तरी उर्वरित खताचा पुरवठा तत्काळ होईल. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कृषी आयुक्त घेणार विभागाचा आढावाकृषी विभागाचे आयुक्त विकास देशमुख हे शुक्रवारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते गडचिरोली जिल्ह्यातील खते, बियाणे, किटकनाशके यांचा पुरवठा तसेच जिल्ह्यातील पीक परिस्थिती यांचा आढावा घेणार आहेत. त्यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील युरीयाचा तुटवडा लक्षात आणून द्यावा, अशी मागणी होत आहे.