शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

दारू, तंबाखू मुक्तीतूनच रोगमुक्ती शक्य

By admin | Updated: January 7, 2016 02:02 IST

प्रदूषण, तंबाखू व दारूचे व्यसन ही तीन रोगांची प्रमुख कारणे आहेत. तंबाखू, दारू सेवनामुळे वयस्कर...

गडचिरोली : प्रदूषण, तंबाखू व दारूचे व्यसन ही तीन रोगांची प्रमुख कारणे आहेत. तंबाखू, दारू सेवनामुळे वयस्कर माणसामध्ये लकवा, हृदयरोग, श्वसन, फुफ्फुसाचे रोग तसेच तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उच्च रक्तदाब व मधुमेह तसेच कॅन्सर हे रोग कितीही औषधोपचार केला तरी कायमस्वरूपी दुरूस्त होत नाही. गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू व दारू व्यसनाचे प्रमाण अधिक असल्याने येथे आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तंबाखू व दारूमुक्तीतूनच रोगमुक्ती शक्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग यांनी केले.शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याची जबाबदारी सरकारची - किलोरभारतीय संविधानाने सन्मानाचे व चांगले जीवन जगण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार व हक्क बहाल केला आहे. यात आरोग्याचा मोठा सहभाग आहे. गडचिरोली जिल्ह्यात डॉक्टर व औषधींची कमतरता असल्यामुळे मोठी आरोग्य समस्या आहे. जिल्ह्यातील शेवटच्या माणसापर्यंत परिपूर्ण आरोग्य सेवा पोहोचविण्याची राज्य सरकारची संविधानिक जबाबदारी आहे. ती सरकारने योग्यरित्या बजावावी, असे अ‍ॅड. अनिल किलोर यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात वनौषधीवर आधारित रिसर्च होण्यासाठी संशोधन केंद्र स्थापन व्हावेत, तसेच येथे आयुर्वेदिक दवाखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असेही अ‍ॅड. किलोर यावेळी म्हणाले.जिल्हा जंगल कामगार सहकारी संघ गडचिरोली व डॉ. गिल्लुरकर हॉस्पिटल नागपूरच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी येथील जंकासं कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. अभय बंग बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जनमंच संस्था नागपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून जंकासं नागपूरचे अध्यक्ष वासुदेवशाहा टेकाम, प्रभारी जिल्हा उपनिबंधक एम. एल. गणवीर, नागपूरचे मधुमेह रोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर, माजी आ. हरिराम वरखडे, घनश्याम मडावी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. बंग म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात ८० हजार मोटार सायकल आहेत. युवकांकडून मोठ्या प्रमाणात दुचाकी अपघात जिल्ह्यात होत आहेत. अनेकांना यात आपला जीव गमवावा लागला. गडचिरोली तालुक्यातील खुर्सा गावात गेल्या दोन वर्षांपासून दारू १०० टक्के बंद आहे. तसेच वर्षभरापासून तंबाखू व खर्रा बंद आहे. तसेच घोट परिसरातील गरंजी हे गाव गेल्या सहा महिन्यांपासून १०० टक्के दारू व तंबाखूमुक्त झाले आहे. जंकासं संस्थांनी दारू व तंबाखूमुक्तीसाठी प्रयत्न करून निरोगी समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.