शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
3
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
4
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
5
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
6
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
7
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
8
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
9
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
10
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
11
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
12
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
13
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
14
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
15
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
16
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
17
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
18
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
19
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
20
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार

दारू, तंबाखू मुक्तीतूनच रोगमुक्ती शक्य

By admin | Updated: January 7, 2016 02:02 IST

प्रदूषण, तंबाखू व दारूचे व्यसन ही तीन रोगांची प्रमुख कारणे आहेत. तंबाखू, दारू सेवनामुळे वयस्कर...

गडचिरोली : प्रदूषण, तंबाखू व दारूचे व्यसन ही तीन रोगांची प्रमुख कारणे आहेत. तंबाखू, दारू सेवनामुळे वयस्कर माणसामध्ये लकवा, हृदयरोग, श्वसन, फुफ्फुसाचे रोग तसेच तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उच्च रक्तदाब व मधुमेह तसेच कॅन्सर हे रोग कितीही औषधोपचार केला तरी कायमस्वरूपी दुरूस्त होत नाही. गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू व दारू व्यसनाचे प्रमाण अधिक असल्याने येथे आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तंबाखू व दारूमुक्तीतूनच रोगमुक्ती शक्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग यांनी केले.शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याची जबाबदारी सरकारची - किलोरभारतीय संविधानाने सन्मानाचे व चांगले जीवन जगण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार व हक्क बहाल केला आहे. यात आरोग्याचा मोठा सहभाग आहे. गडचिरोली जिल्ह्यात डॉक्टर व औषधींची कमतरता असल्यामुळे मोठी आरोग्य समस्या आहे. जिल्ह्यातील शेवटच्या माणसापर्यंत परिपूर्ण आरोग्य सेवा पोहोचविण्याची राज्य सरकारची संविधानिक जबाबदारी आहे. ती सरकारने योग्यरित्या बजावावी, असे अ‍ॅड. अनिल किलोर यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात वनौषधीवर आधारित रिसर्च होण्यासाठी संशोधन केंद्र स्थापन व्हावेत, तसेच येथे आयुर्वेदिक दवाखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असेही अ‍ॅड. किलोर यावेळी म्हणाले.जिल्हा जंगल कामगार सहकारी संघ गडचिरोली व डॉ. गिल्लुरकर हॉस्पिटल नागपूरच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी येथील जंकासं कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. अभय बंग बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जनमंच संस्था नागपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून जंकासं नागपूरचे अध्यक्ष वासुदेवशाहा टेकाम, प्रभारी जिल्हा उपनिबंधक एम. एल. गणवीर, नागपूरचे मधुमेह रोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर, माजी आ. हरिराम वरखडे, घनश्याम मडावी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. बंग म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात ८० हजार मोटार सायकल आहेत. युवकांकडून मोठ्या प्रमाणात दुचाकी अपघात जिल्ह्यात होत आहेत. अनेकांना यात आपला जीव गमवावा लागला. गडचिरोली तालुक्यातील खुर्सा गावात गेल्या दोन वर्षांपासून दारू १०० टक्के बंद आहे. तसेच वर्षभरापासून तंबाखू व खर्रा बंद आहे. तसेच घोट परिसरातील गरंजी हे गाव गेल्या सहा महिन्यांपासून १०० टक्के दारू व तंबाखूमुक्त झाले आहे. जंकासं संस्थांनी दारू व तंबाखूमुक्तीसाठी प्रयत्न करून निरोगी समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.