शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

बंधुत्वाच्या भावनेनेच विषमता दूर होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 00:54 IST

प्रतिकूल परिस्थितीतही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजामधील विषमता दूर करण्याचे काम केले.

देवराव होळी यांचे प्रतिपादन : सामाजिक न्याय दिनाचा मुख्य कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रतिकूल परिस्थितीतही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजामधील विषमता दूर करण्याचे काम केले. आता जातीय विषमता दूर करण्यासाठी बंधूत्वाची भावना निर्माण केली पाहिजे, त्याकरिता लोकशाही प्रणालीत शासन व प्रशासनातील यंत्रणेने समन्वय ठेवून सामाजिक दायित्वाचे भान ठेवून त्या पद्धतीने काम केले पाहिजे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात सामाजिक न्याय दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, नगरसेवक प्रमोद पिपरे, पालिकेचे पाणीपुरवठा सभापती केशव निंबोळ, जि. प. चे समाजकल्याण अधिकारी पेंदाम, सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, पांडे, नंदू काबरा आदी उपस्थित होते.पुढे बोलताना आ. डॉ. होळी म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकांना समान अधिकार व सोयीसुविधा निर्माण करून देण्याचे तसेच दीनदुबळे, गरीब व वंचित लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम स्वातंत्र्यपूर्व काळात छत्रपती शाहू महाराजांनी केले, असे ते म्हणाले.जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी शाहू महाराज यांच्या कार्यावर सविस्तरपणे प्रकाश टाकला. समाजातील उपेक्षित लोकांना मोठ्या शिक्षणाची संधी मिळून मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळाली. हे शाहू महाराज यांच्या कार्यामुळेच शक्य झाले, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, संचालन शिवाजी पाटील यांनी केले तर आभार सुरेश पेंदाम यांनी मानले. अपंग-अव्यंग विवाह योजनेतून मदतसामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे अपंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नरेश लहानूजी नारनवरे व आरती नारनवरे या दाम्पत्याला आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते ५० हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच समाजकल्याण विभागाच्या निवासी शासकीय शाळेतून विशेष प्रावीण्यप्राप्त मिळवून उत्तीर्ण झालेल्या प्रफुल बापू आलमवार व किरण समय्या जनगाम यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.