शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

बंधुत्वाच्या भावनेनेच विषमता दूर होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 00:54 IST

प्रतिकूल परिस्थितीतही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजामधील विषमता दूर करण्याचे काम केले.

देवराव होळी यांचे प्रतिपादन : सामाजिक न्याय दिनाचा मुख्य कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रतिकूल परिस्थितीतही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजामधील विषमता दूर करण्याचे काम केले. आता जातीय विषमता दूर करण्यासाठी बंधूत्वाची भावना निर्माण केली पाहिजे, त्याकरिता लोकशाही प्रणालीत शासन व प्रशासनातील यंत्रणेने समन्वय ठेवून सामाजिक दायित्वाचे भान ठेवून त्या पद्धतीने काम केले पाहिजे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात सामाजिक न्याय दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, नगरसेवक प्रमोद पिपरे, पालिकेचे पाणीपुरवठा सभापती केशव निंबोळ, जि. प. चे समाजकल्याण अधिकारी पेंदाम, सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, पांडे, नंदू काबरा आदी उपस्थित होते.पुढे बोलताना आ. डॉ. होळी म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकांना समान अधिकार व सोयीसुविधा निर्माण करून देण्याचे तसेच दीनदुबळे, गरीब व वंचित लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम स्वातंत्र्यपूर्व काळात छत्रपती शाहू महाराजांनी केले, असे ते म्हणाले.जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी शाहू महाराज यांच्या कार्यावर सविस्तरपणे प्रकाश टाकला. समाजातील उपेक्षित लोकांना मोठ्या शिक्षणाची संधी मिळून मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळाली. हे शाहू महाराज यांच्या कार्यामुळेच शक्य झाले, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, संचालन शिवाजी पाटील यांनी केले तर आभार सुरेश पेंदाम यांनी मानले. अपंग-अव्यंग विवाह योजनेतून मदतसामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे अपंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नरेश लहानूजी नारनवरे व आरती नारनवरे या दाम्पत्याला आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते ५० हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच समाजकल्याण विभागाच्या निवासी शासकीय शाळेतून विशेष प्रावीण्यप्राप्त मिळवून उत्तीर्ण झालेल्या प्रफुल बापू आलमवार व किरण समय्या जनगाम यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.