शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

विलगीकरण कक्षात सर्वत्र घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

एटापल्ली येथील विविध शासकीय इमारतीत विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. सध्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात परतलेल्या नागरिकांना ठेवण्यात आले आहे. दोन्ही इमारतींमध्ये सध्या सहा महिला व २० पुरूष आहेत. मात्र आयटीआयमधील विलगीकरण कक्षात स्वच्छतेचा अभाव आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला कळविले. परंतु काहीच उपयोग झाला नाही.

ठळक मुद्देस्वच्छतेकडे दुर्लक्ष : एटापल्लीच्या आयटीआयमधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : परजिल्हा व राज्यातून परतलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. मात्र एटापल्ली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात नागरिकांसाठी योग्य सोयी, सुविधा नाहीत. त्यातच विलगीकरण कक्षाला घाणीचा विळखा आहे. अनेक खोल्यांमध्ये घाण असून दुर्गंधी येत आहे. तसेच शौचालयसुद्धा दुर्गंधीयुक्त असतानाही येथे नागरिकांना राहावे लागत आहे. मात्र या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.एटापल्ली येथील विविध शासकीय इमारतीत विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. सध्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात परतलेल्या नागरिकांना ठेवण्यात आले आहे. दोन्ही इमारतींमध्ये सध्या सहा महिला व २० पुरूष आहेत. मात्र आयटीआयमधील विलगीकरण कक्षात स्वच्छतेचा अभाव आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला कळविले. परंतु काहीच उपयोग झाला नाही. परिणामी दुर्गंधीतच नागरिकांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण करावा लागत आहे. येथील स्वच्छता नियमित केली जात नाही. सफाईगार आल्यास बाहेरूनच झाडू मारून निघून जातात. येथील शौचालय, बाथरूम, बेसिनमध्ये घाण आहे. त्यामुळे टाकलेले पाणी झिरपत नाही. फरश्यांचीसुद्धा साफसफाई करून पुसल्या जात नाही.विशेष म्हणजे, अनेक प्रवाशांना एकच शौचालय व बाथरूमचा वापर करावा लागत आहे. वेगवेगळी व्यवस्था नसल्याने बाधित रूग्ण आढळल्यास सर्वांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विविध कारणांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्ष वादग्रस्त ठरले आहे. काही नागरिकांनी येथील अस्वच्छतेचे फोटो मोबाईलद्वारे काढून नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग यांना पाठविले. तसेच समाज माध्यमांवरसुद्धा झळकले. तेव्हा तेलंग यांनी विलगीकरण कक्षाला भेट देऊन पाहणी करीत संबंधित कर्मचाऱ्यांना स्वच्छता करण्याचे निर्देश दिले. परंतु याचा काहीच उपयोग झाला नाही. विलगीकरण कक्षाला अद्यापही घाणीचा विळखा आहे.विशेष म्हणजे, १३ जून २०२० ला येथे ठेवण्यात आलेल्या दोघांनी पळ काढला होता. मात्र एक जण अध्या तासातच परतला. तर दुसरा पहाटेच्या सुमारास परत आला. एवढी मोठी घटना घडूनही याबाबत कोणत्याही व्यक्तीने बाहेर वाच्यता केली नाही.नागरिकांच्या अनेक तक्रारीविलगीकरण कक्षातील असुविधांमुळे १४ दिवसांचा कालावधी पूर्ण करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने अनेकांनी या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. परंतु त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. येथील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात नाही. तसेच नागपूर रेड झोनमधून आलेल्या काही लोकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले तर काही लोकांना गृह विलगीकरणात करण्यात आले. अशा प्रकारचा दुजाभाव का करण्यात आला, असा सवालही नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, येथील नागरिकांना योग्य प्रकारे मिळत नाही. केवळ वरणभात व पोळी वारंवार भोजनात दिली जात असल्याचीसुद्धा तक्रार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या