शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

विलगीकरण कक्षात सर्वत्र घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

एटापल्ली येथील विविध शासकीय इमारतीत विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. सध्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात परतलेल्या नागरिकांना ठेवण्यात आले आहे. दोन्ही इमारतींमध्ये सध्या सहा महिला व २० पुरूष आहेत. मात्र आयटीआयमधील विलगीकरण कक्षात स्वच्छतेचा अभाव आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला कळविले. परंतु काहीच उपयोग झाला नाही.

ठळक मुद्देस्वच्छतेकडे दुर्लक्ष : एटापल्लीच्या आयटीआयमधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : परजिल्हा व राज्यातून परतलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. मात्र एटापल्ली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात नागरिकांसाठी योग्य सोयी, सुविधा नाहीत. त्यातच विलगीकरण कक्षाला घाणीचा विळखा आहे. अनेक खोल्यांमध्ये घाण असून दुर्गंधी येत आहे. तसेच शौचालयसुद्धा दुर्गंधीयुक्त असतानाही येथे नागरिकांना राहावे लागत आहे. मात्र या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.एटापल्ली येथील विविध शासकीय इमारतीत विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. सध्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात परतलेल्या नागरिकांना ठेवण्यात आले आहे. दोन्ही इमारतींमध्ये सध्या सहा महिला व २० पुरूष आहेत. मात्र आयटीआयमधील विलगीकरण कक्षात स्वच्छतेचा अभाव आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला कळविले. परंतु काहीच उपयोग झाला नाही. परिणामी दुर्गंधीतच नागरिकांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण करावा लागत आहे. येथील स्वच्छता नियमित केली जात नाही. सफाईगार आल्यास बाहेरूनच झाडू मारून निघून जातात. येथील शौचालय, बाथरूम, बेसिनमध्ये घाण आहे. त्यामुळे टाकलेले पाणी झिरपत नाही. फरश्यांचीसुद्धा साफसफाई करून पुसल्या जात नाही.विशेष म्हणजे, अनेक प्रवाशांना एकच शौचालय व बाथरूमचा वापर करावा लागत आहे. वेगवेगळी व्यवस्था नसल्याने बाधित रूग्ण आढळल्यास सर्वांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विविध कारणांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्ष वादग्रस्त ठरले आहे. काही नागरिकांनी येथील अस्वच्छतेचे फोटो मोबाईलद्वारे काढून नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग यांना पाठविले. तसेच समाज माध्यमांवरसुद्धा झळकले. तेव्हा तेलंग यांनी विलगीकरण कक्षाला भेट देऊन पाहणी करीत संबंधित कर्मचाऱ्यांना स्वच्छता करण्याचे निर्देश दिले. परंतु याचा काहीच उपयोग झाला नाही. विलगीकरण कक्षाला अद्यापही घाणीचा विळखा आहे.विशेष म्हणजे, १३ जून २०२० ला येथे ठेवण्यात आलेल्या दोघांनी पळ काढला होता. मात्र एक जण अध्या तासातच परतला. तर दुसरा पहाटेच्या सुमारास परत आला. एवढी मोठी घटना घडूनही याबाबत कोणत्याही व्यक्तीने बाहेर वाच्यता केली नाही.नागरिकांच्या अनेक तक्रारीविलगीकरण कक्षातील असुविधांमुळे १४ दिवसांचा कालावधी पूर्ण करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने अनेकांनी या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. परंतु त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. येथील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात नाही. तसेच नागपूर रेड झोनमधून आलेल्या काही लोकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले तर काही लोकांना गृह विलगीकरणात करण्यात आले. अशा प्रकारचा दुजाभाव का करण्यात आला, असा सवालही नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, येथील नागरिकांना योग्य प्रकारे मिळत नाही. केवळ वरणभात व पोळी वारंवार भोजनात दिली जात असल्याचीसुद्धा तक्रार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या