शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

ठेंगण्या पुलाने वाट अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:05 IST

सिरोंचा तालुक्यातील पातागुडम परिसरातील सोमनपल्ली नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात नेहमी पाणी राहत असल्याने परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून आसरअल्ली हे गाव गाठावे लागते. या नाल्यामुळे परिसरातील सुमारे १० गावांचा संपर्क तुटतो.

ठळक मुद्देसोमनपल्ली नाल्याच्या पुलावर चढते पाणी । डोंग्याने करावा लागतो धोकादायक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील पातागुडम परिसरातील सोमनपल्ली नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात नेहमी पाणी राहत असल्याने परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून आसरअल्ली हे गाव गाठावे लागते. या नाल्यामुळे परिसरातील सुमारे १० गावांचा संपर्क तुटतो.पातागुडम परिसरात सोमनपल्ली, कोपेल्ला, कोर्लामाल, रमेशगुडम, देचलीपेठा, झिंगानूर, पातागुडम, रायगुडम व पेंड्याला या दहा गावाच समावेश होतो. या परिसरातील आसरअल्ली हे सर्वात मोठे गाव आहे. त्यामुळे भाजीपाला, किराणा खरेदी करायचा असेल तर आसरअल्लीला गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. सिरोंचा हे तालुका मुख्यालय या गावांपासून सुमारे ५५ किमी अंतरावर आहे. त्यामुळे अनेकांनी तर तालुकास्थळ सुध्दा बघितला नाही. अशी या भागातील नागरिकांची विपरित स्थिती आहे. पातागुडम ते सिरोंचा दरम्यान मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरील जवळपास सर्वच नाल्यांवरील पुलांची उंची वाढविण्यात आली आहे. मात्र सोमनपल्ली नाल्यावरील ठेंगणा पूल अजुनही कायम आहे. हा परिसर जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे थोडाही पाऊस पडला तरी नाला ओसंडून वाहण्यास सुरूवात होते. मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सोमनपल्ली नाल्यावरून सतत १५ दिवस पाणी वाहत होते. त्यामुळे या संपूर्ण गावांचा संपर्क तुटला होता. नाल्यावरील पुलावरून पाच फुटापेक्षा अधिक पाणी होते. या पाण्यातूनही काही नागरिक मार्ग काढत होते.पूर परिस्थितीत या परिसरातील नागरिकांना डोंग्याने प्रवास करावा लागतो. मात्र हा प्रवास अतिशय धोकादायक राहतो.दीड महिन्यांपासून वीज पुरवठा खंडितसिरोंचा तालुकास्थळापासून सुमारे ५५ किमी अंतरावर असलेला पातागुडमचा परिसर जंगलाने व्यापला आहे. जंगलातून वीज तारा टाकल्या असल्याने पावसाळ्यात वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. ही बाब येथील नागरिकही मान्य करतात. मात्र एकदा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर तो दुरूस्त करण्यासाठी येथील महावितरणचे कर्मचारी कोणतीच कार्यवाही करीत नाही. त्यामुळेच या परिसरातील वीज पुरवठा मागील दीड महिन्यांपासून खंडीत झाला आहे. दुर्गम भागातील आदिवासी नागरिक कोणतीही तक्रार करीत नाही. याचा गैरफायदा या परिसरातील वीज कर्मचारी घेत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.अनेकांनी बघितले नाही तालुकास्थळसिरोंचा हे तालुकास्थळ पातागुडमपासून सुमारे ५५ किमी अंतरावर आहे. या परिसरातील गावे जंगलाने व्यापली आहेत. सिरोंचाला जायचे असेल तर सर्वप्रथम आसरअल्ली गाठावे लागते. आसरअल्लीपर्यंत जाण्यासाठी वाहने उपलब्ध नाहीत. त्यामुळे विशेष करून अनेक महिलांनी सिरोंचा हे तालुकास्थळ सुध्दा अजूनपर्यंत बघितले नाही. जिल्हास्थळ तर फार दूर आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर