शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

ठेंगण्या पुलाने वाट अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:05 IST

सिरोंचा तालुक्यातील पातागुडम परिसरातील सोमनपल्ली नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात नेहमी पाणी राहत असल्याने परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून आसरअल्ली हे गाव गाठावे लागते. या नाल्यामुळे परिसरातील सुमारे १० गावांचा संपर्क तुटतो.

ठळक मुद्देसोमनपल्ली नाल्याच्या पुलावर चढते पाणी । डोंग्याने करावा लागतो धोकादायक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील पातागुडम परिसरातील सोमनपल्ली नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात नेहमी पाणी राहत असल्याने परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून आसरअल्ली हे गाव गाठावे लागते. या नाल्यामुळे परिसरातील सुमारे १० गावांचा संपर्क तुटतो.पातागुडम परिसरात सोमनपल्ली, कोपेल्ला, कोर्लामाल, रमेशगुडम, देचलीपेठा, झिंगानूर, पातागुडम, रायगुडम व पेंड्याला या दहा गावाच समावेश होतो. या परिसरातील आसरअल्ली हे सर्वात मोठे गाव आहे. त्यामुळे भाजीपाला, किराणा खरेदी करायचा असेल तर आसरअल्लीला गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. सिरोंचा हे तालुका मुख्यालय या गावांपासून सुमारे ५५ किमी अंतरावर आहे. त्यामुळे अनेकांनी तर तालुकास्थळ सुध्दा बघितला नाही. अशी या भागातील नागरिकांची विपरित स्थिती आहे. पातागुडम ते सिरोंचा दरम्यान मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरील जवळपास सर्वच नाल्यांवरील पुलांची उंची वाढविण्यात आली आहे. मात्र सोमनपल्ली नाल्यावरील ठेंगणा पूल अजुनही कायम आहे. हा परिसर जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे थोडाही पाऊस पडला तरी नाला ओसंडून वाहण्यास सुरूवात होते. मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सोमनपल्ली नाल्यावरून सतत १५ दिवस पाणी वाहत होते. त्यामुळे या संपूर्ण गावांचा संपर्क तुटला होता. नाल्यावरील पुलावरून पाच फुटापेक्षा अधिक पाणी होते. या पाण्यातूनही काही नागरिक मार्ग काढत होते.पूर परिस्थितीत या परिसरातील नागरिकांना डोंग्याने प्रवास करावा लागतो. मात्र हा प्रवास अतिशय धोकादायक राहतो.दीड महिन्यांपासून वीज पुरवठा खंडितसिरोंचा तालुकास्थळापासून सुमारे ५५ किमी अंतरावर असलेला पातागुडमचा परिसर जंगलाने व्यापला आहे. जंगलातून वीज तारा टाकल्या असल्याने पावसाळ्यात वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. ही बाब येथील नागरिकही मान्य करतात. मात्र एकदा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर तो दुरूस्त करण्यासाठी येथील महावितरणचे कर्मचारी कोणतीच कार्यवाही करीत नाही. त्यामुळेच या परिसरातील वीज पुरवठा मागील दीड महिन्यांपासून खंडीत झाला आहे. दुर्गम भागातील आदिवासी नागरिक कोणतीही तक्रार करीत नाही. याचा गैरफायदा या परिसरातील वीज कर्मचारी घेत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.अनेकांनी बघितले नाही तालुकास्थळसिरोंचा हे तालुकास्थळ पातागुडमपासून सुमारे ५५ किमी अंतरावर आहे. या परिसरातील गावे जंगलाने व्यापली आहेत. सिरोंचाला जायचे असेल तर सर्वप्रथम आसरअल्ली गाठावे लागते. आसरअल्लीपर्यंत जाण्यासाठी वाहने उपलब्ध नाहीत. त्यामुळे विशेष करून अनेक महिलांनी सिरोंचा हे तालुकास्थळ सुध्दा अजूनपर्यंत बघितले नाही. जिल्हास्थळ तर फार दूर आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर