शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धर्मरावबाबांना मंत्रिपदाने दिली हुलकावणी! भाजपचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नावाचीही होती चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 14:21 IST

जिल्ह्याची पाटी कोरीच: नरोटेंनाही संधी नाही; भाजप कार्यकर्त्यांचा झाला हिरमोड

संजय तिपाले लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कन्या व पुतणे अशा कुटुंबातील दोघांनी खिंडीत पकडूनही मोठ्या फरकाने विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणणारे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांना मंत्रिमंडळ विस्तारात शेवटच्या क्षणी डावलण्यात आले. शिवाय पहिल्यांदाच विधानसभेत गेलेले भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे यांनाही संधी मिळाली नाही. त्यामुळे धर्मरावबाबा समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. जिल्ह्यात तीनपैकी दोन जागांवर महायुतीने विजय मिळविला. सत्तारूढ सरकारच्या बाजूने कौल देऊनही मंत्रिपदाच्या बाबतीत जिल्ह्याची झोळी रितीच राहिली. 

विदर्भातील राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) प्रमुख चेहरा तसेच आदिवासी नेते म्हणून धर्मरावबाबा यांची ओळख आहे. सरपंच ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास केलेल्या धर्मरावबाबा यांना यावेळच्या निवडणुकीत कन्या भाग्यश्री आत्राम (हलगेकर) व बंडखोरी करत पुतणे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आव्हान दिले होते. त्यामुळे अहेरीतील नात्यागोत्याची लढत राज्यभर चर्चेत होती. धर्मरावबाबा यांनी आपला गड राखून वर्चस्व सिद्ध केले होते. यापूर्वी तीनवेळा राज्यमंत्रिपद, मागच्या सरकारमध्ये कैबिनेट मंत्रिपद भूषविणाऱ्या धर्मरावबाबा हे यावेळी देखील मंत्रिपदाचे दावेदार होते, पण शेवटच्या क्षणी त्यांचे नाव आश्चर्यकारकरीत्या मागे पडले. 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत सन्नाटा धर्मरावबाबा आत्राम है प्रदीर्घ अनुभवी नेते आहेत. कारकिर्दीत त्यांनी आठवेळा विधानसभा निवडणूक लढवली. त्यातील तीन निवडणुकांत त्यांना हार पत्करावी लागली, पण पाचवेळा त्यांनी विजय मिळविला. मंत्रिमंडळात त्यांचा समावेश न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकत्यांत सन्नाटा पसरला होता. मंत्रिपदाच्या अपेक्षेने अनेकांनी उपराजधानी गाठली होती, पण त्यांना निराश होऊन परतावे लागले. दुसरीकडे नवखे असले तरी भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे यांना सुशिक्षित व तरुण चेहरा म्हणून संधी मिळेल, अशी समर्थकांना अपेक्षा होती, पण त्यांचाही भ्रमनिरास झाला.

पालकमंत्रिपद कोणाकडे? जिल्हा माओवादप्रभावित असला तरी आता विकासाकडे झेपायत आहे. मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लोह खनिज उत्खनन, त्यावर आधारित पोलाद निर्मिती प्रकल्प आकार घेऊ लागले आहेत. त्यामुळे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाचे वेगळे महत्त्व आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्रिपद कोणाकडे जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शेजारच्या चंद्रपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्याचीही मंत्रिमंडळ विस्तारात पाटी कोरीच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडेच पालकमंत्रिपद ठेवतात की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा पालकमंत्री होऊन जिल्ह्याची सूत्रे आपल्या हाती घेतात, याची उत्सुकता आहे.

यापूर्वी कोणी- कोणी भूषविले मंत्रिपद ? वर्ष                      नाव                           मंत्रिपद                  पक्ष १९८५             बाबूराव मडावी                 राज्यमंत्री              काँग्रेस १९९०             धर्मरावबाबा आत्राम            राज्यमंत्री             काँग्रेस १९९४             मारोतराव कोवासे              राज्यमंत्री             काँग्रेस१९९९             धर्मरावबाबा आत्राम            राज्यमंत्री             गोंडवाना गणतंत्र पार्टी  २००४             धर्मरावबाचा आत्राम           राज्यमंत्री             राष्ट्रवादी काँग्रेस२०१४             अम्ब्रीशराव आत्राम            राज्यमंत्री              भाजप२०२३             धर्मरावबाबा आत्राम           कॅबिनेट मंत्री         राष्ट्रवादी (अजित पवार गट)

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनGadchiroliगडचिरोली