शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

ग्रामसेवकांचा धडक मोर्चा

By admin | Updated: July 1, 2014 01:28 IST

जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक जिल्हा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर

गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक जिल्हा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान येथील आयटीआय चौकातून जिल्हाभरातून शेकडो ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.या मोर्चाचे नेतृत्व ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, सहसचिव पुरूषोत्तम बनपुरकर, सरचिटणीस प्रदीप भांडेकर यांनी केले. मोर्चा पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा घेण्यात आली. या सभेमध्ये ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आक्रमक भूमिका मांडली. त्यानंतर ग्रामसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठविणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. दिलेल्या निवेदनात ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात याव्या, ग्रामपंचायतस्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ, कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत रूजू झालेल्या तारखेपासून ग्राह्य धरावा, २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारीपद निर्माण करण्यात यावे, वेतनासोबत ३ हजार रूपये प्रवासभत्ता देण्यात यावा, सर्व संवर्गाकरिता बदल्यांचे धोरण एकच ठेवावे आदी मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनाला जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, विस्तार अधिकारी संघटना, जिल्हा परिषद नर्सेस संघटना, जिल्हा महिला समिती आदी संघटनांनी पाठींबा दर्शविला. या मोर्चात ग्रामसेवक संघटनेचे कायदे सल्लागार विजय पत्रे, विभागीय संघटक निलकंठ धानोरकर, शंकर कुनघाडकर, जि. प. कर्मचारी महासंघाचे राज्यध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष वामनराव सावसाकडे, जि. प. नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष माया सिरसाट, जिल्हा महिला समितीच्या सचिव माया बाळराजे आदी सहभागी झाले होते.यावेळी मार्गदर्शन करतांना उमेशचंद्र चिलबुले म्हणाले, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी यांचे सेवाविषयक, प्रशासकीय प्रश्न तसेच वेतनश्रेणीचा प्रश्न शासनासोबत वारंवार सकारात्मक चर्चा करूनही मार्गी लागले नाही. यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील ग्रामसेवक वर्गांमध्ये शासनाप्रती तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे ग्रामसेवकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. शासनाने मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा उमेशचंद्र चिलबुले यांनी यावेळी दिला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. (स्थानिक प्रतिनिधी)