शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

फडणवीस म्हणाले, विमानतळ करू; गडकरी म्हणाले, रेल्वेही धावणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 13:08 IST

धर्मरावबाबांची अनुपस्थिती : सत्तानाट्यानंतर उपमुख्यमंत्री पहिल्यांदा गडचिरोलीत

गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ ५ जुलै रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. जिल्हा निर्मितीनंतर राष्ट्रपतींचा पहिलाच गडचिरोली दौरा होता. विशेष म्हणजे राष्ट्रपती झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू या पहिल्यांदाच राज्यात आल्या. २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाने भाजप- शिवसेना (शिंदे गट) सरकारला पाठिंबा दिला. या सत्तानाट्यानंतर तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीत विमानतळासाठी तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील लोहखनिजासह इतर वनउपजांचा आवर्जून उल्लेख करत येथे उद्योगांना तसेच विकासाला वाव असल्याचे सांगितले. जिल्ह्यात नक्षल्यांचा प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे वनउपजावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारता येतील. यातून अनेकांना रोजगार मिळेल, शिवाय विमानतळासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत, असे सांगितले. गोंडवाना विद्यापीठातून शिक्षणाच्या संधी आहेत, या विद्यापीठाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्याच्या विकासात गोंडवाना विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री व वनमंत्री यांनी या जिल्ह्यासाठी अनेक कामे मंजूर केल्याचा उल्लेख केला. लोहप्रकल्पामुळे येथे गुंतवणूक वाढणार आहे. यासाठी रेल्वे येणे आवश्यक असून पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

गोंडवानाचे नाव जागतिक स्तरावर जाईल : राष्ट्रपती

गोंडवाना विद्यापीठाने आदिवासी व मागास विद्यार्थ्यांना शिक्षणातून रोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. याचा फायदा घेऊन प्रगती करावी, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. गोंडवाना विद्यापीठाचे नाव जागतिक स्तरावर जाईल, असा आशावाद व्यक्त करून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमातून स्थानिक विकासाला चालना दिल्याचा उल्लेख केला.

व्हीव्हीआयपींच्या दौऱ्याने शहराला छावणीचे स्वरुप

दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रपतींसह राज्यपाल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, डॉ.विजयकुमार गावित तसेच मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे व्हीआयपी नेते जिल्ह्यात आले होते. त्यामुळे ४ जुलैपासूनच पोलिसांनी सुरक्षेसाठी शहराला जोडणाऱ्या चारही मार्गांवर नाकाबंदी केली होती. वाहनांची कसून तपासणी केली. कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त होता. त्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप आले होते. रस्त्यावर जागोजागी पोलिस तैनात होते.

दोन ठिकाणी कसून झाडाझडती...

कार्यक्रमस्थळी एक हजार जणांनाच प्रवेश होता. प्रत्येकाची कसून तपासणी केली जात होती. मुख्य प्रवेशद्वारासह शामियानात प्रवेश करतानाही झाडाझडती घेतली जात हाेती. महिलांना पर्स आत नेण्यास मज्जाव केला होता. सर्व पर्स प्रवेशद्वारावरच ठेवल्या होत्या.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadkariनितीन गडकरीGadchiroliगडचिरोली