शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उपवन विभागांची निर्मिती होणार

By admin | Updated: September 29, 2014 23:06 IST

प्रशासनात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून महसूल विभागाच्या धर्तीवर वन विभागातसुद्धा उपवनविभागाची निर्मिती केली जाणार आहे. एका उपवन विभागात तीन वनपरिक्षेत्र कार्यालयांचा समावेश आहे.

गडचिरोली : प्रशासनात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून महसूल विभागाच्या धर्तीवर वन विभागातसुद्धा उपवनविभागाची निर्मिती केली जाणार आहे. एका उपवन विभागात तीन वनपरिक्षेत्र कार्यालयांचा समावेश आहे. गडचिरोली वनवृत्त कार्यालयाच्या अंतर्गत गडचिरोली, देसाईगंज, आलापल्ली, भामरागड व सिरोंचा हे पाच वन विभाग आहेत. मात्र ज्या जिल्ह्यामध्ये जंगलाचे प्रमाण कमी आहे. अशा जिल्ह्यात तीन ते चार जिल्ह्यांचा मिळून एक वनवृत्त कार्यालय तयार करण्यात आले आहे. व एका जिल्ह्यामध्ये एकच वनविभाग आहे. भौगोलिक क्षेत्र मोठे राहत असल्याने सदर जंगालाची पाहणी करणे, अशक्य होऊन बसत होते. त्याचबरोबर प्रशासनात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून उपवनविभाग निर्मिती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. यानुसार गडचिरोली वनविभागात धानोरा व गडचिरोली हे दोन उपविभाग निर्माण केले जाणार आहेत. देसाईगंज वन विभागात देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा या तीन ठिकाणी उपवनविभागाचे कार्यालय स्थापन केले जाणार आहे. आलापल्ली वन विभागात घोट, आलापल्ली, भामरागड वन विभागात एटापल्ली, भामरागड तर सिरोंचा वनविभागात जिमलगट्टा, कमलापूर, सिरोंचा या ठिकाणी उपवन विभागांची निर्मिती केली जाणार आहे. सहायक वनसंरक्षक हे वनविभागातील गट ‘अ’ चे पद असून वनांचे रक्षण, संवर्धन व व्यवस्थापनाची जबाबदारी सहायक वनसंरक्षकांवर राहते. त्यासाठी त्यांच्या दिमतीला वन कर्मचाऱ्यांचा ताफा राहतो. मात्र त्यांना कार्यालय प्रमुखाचा दर्जा राहत नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. सहायक वनसंरक्षकांना त्यांचे कर्तव्य अधिक प्रभावीपणे पार पाडता यावे, यासाठी त्यांना कार्यालय प्रमुख म्हणून दर्जा दिल्या जाणार आहे. महसूल विभागाप्रमाणेच वन विभागातही उपविभागांची निर्मिती करण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र कार्यालयांना वनविभाऐवजी उपवन विभाग कार्यालयाकडे कामाचा अहवाल द्यावा लागणार आहे. यामुळे वेळेची बचत होण्यास फार मोठी मदत होणार आहे. या निर्णयामुळे वन विभागाचे प्रशासन गतिमान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण जास्त असल्याने येथील कर्मचाऱ्यांवर कामाचा भार अधिक आहे. हा भार उचलण्यासाठी उपवन विभागातील कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभणार आहे. (नगर प्रतिनिधी)