शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

मत्स्य विज्ञान केंद्र सुरू करण्यासाठी चाचपणी

By admin | Updated: October 17, 2016 02:08 IST

जिल्ह्यातील तलाव व नद्यांमध्ये बारमाही पाणी राहते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला अतिशय पोषक वातावरण आहे.

अधिकाऱ्यांसोबत चर्चा : कृषी विज्ञान केंद्राला भेटगडचिरोली : जिल्ह्यातील तलाव व नद्यांमध्ये बारमाही पाणी राहते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला अतिशय पोषक वातावरण आहे. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी मत्स्य विज्ञान केंद्राची स्थापना करण्याचा विचार शासनस्तरावरून सुरू आहे. सदर केंद्र सुरू करण्याबाबत गुरूवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.यावेळी जिल्हाधिकारी नायक यांनी कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन या परिसराची पाहणी केली. यावेळी केंद्राचे कार्यक्रम समन्वयक व्ही. जे. तांबे, आत्माचे अधिकारी पवार, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य अमर शेट्टीवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव व नद्यांची संख्या आहे. या जलसाठ्यांमध्ये वर्षभर पाणी राहते. त्यामुळे मत्स्य व्यवसायाला अतिशय पोषक वातावरण गडचिरोली जिल्ह्यात आहे. मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी गावकऱ्यांना त्याबाबतची माहिती व सुविधा पुरविण्याची गरज आहे. ही माहिती पुरविण्यासाठी जिल्हास्तरावर केंद्र स्थापन केले जाणार आहे. कृषी विज्ञान केंद्राचा परिसर खूप मोठा आहे. त्यासोबत आत्मा प्रकल्पाची सांगड घातल्यास प्रशिक्षण व प्रात्यक्षिक एकाच ठिकाणी मिळू शकणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण व्यवस्था अधिक मजूबत होण्यास मदत होईल, असा आशावाद जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.कृषी महाविद्यालयाची इमारत तयार झाली आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे महाविद्यालय स्थलांतरित झाले नाही. लवकरातलवकर कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. धानपिकासंदर्भात करण्यात आलेल्या विविध प्रयोबाबतचे सादरीकरण जिल्हाधिकाऱ्यांसमोर करण्यात आले. (नगर प्रतिनिधी)