शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

गडचिरोली जंगलात १६ नक्षलींचा खात्मा; महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 02:44 IST

भागरागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताडगावपासून ७ किमी अंतरावरील कसनासूर जंगलात पोलिसांचे जवान गस्त घालत होते.

गडचिरोली/नागपूर : गडचिरोलीच्या जंगलात रविवारी नक्षलवादविरोधी अभियानातील पोलिसांच्या कारवाईत १६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यात दोन नक्षली कमांडरचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. यापूर्वी ३ एप्रिलला तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.भागरागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताडगावपासून ७ किमी अंतरावरील कसनासूर जंगलात पोलिसांचे जवान गस्त घालत होते. नक्षल्यांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. धुमश्चक्रीनंतर काही नक्षलवादी पळाले. संध्याकाळपर्यंत १६ नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. सर्व मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी बंदुका व इतर साहित्यही जप्त केले आहे.घटनेनंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हेलिकॉप्टरने तातडीने भामरागडकडे रवाना झाले, अशी माहिती नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक शरद शेलार यांनी दिली.नक्षलींवर लक्ष ठेवण्यास शाखानक्षलवादी नेते आणि त्यांच्याबाबत सहानुभूती ठेवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची एक विशिष्ट शाखा स्थापन करण्यात येत आहे. गृहमंत्रालयाने अलीकडेच या कामासाठी एनआयएमध्ये विशिष्ट शाखा स्थापन करण्यास मंजुरीदिली आहे. दहशतवाद्यांना निधी पुरविण्याच्या प्रकरणात काश्मिरी फुटीरतावाद्यांविरुद्ध एनआयए तपासानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.दोघांवर प्रत्येकी १६ लाखांचे बक्षीससाईनाथ उर्फ डोलेश माजी आत्राम, तसेच श्रीनू उर्फ गीतेंद्र नरसिम्हा रामल्लु या नक्षल नेत्यांचा मृतांमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर प्रत्येकी १६ लाखांचे बक्षीस होते. इतर नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी