शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

देसाईगंजातील एटीएमसेवा कोलमडली

By admin | Updated: March 8, 2017 02:14 IST

नोटबंदीच्या निर्णयापासून देसाईगंज शहरातील एटीएम सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. संपूर्ण शहराचा भार एसबीआय एटीएमवर होता.

ग्राहक त्रस्त : एसबीआयचे एटीएम चार ग्राहकांनी पैसे काढल्यानंतर पडते बंद देसाईगंज : नोटबंदीच्या निर्णयापासून देसाईगंज शहरातील एटीएम सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. संपूर्ण शहराचा भार एसबीआय एटीएमवर होता. मात्र सदर एटीएममध्येही शुक्रवारपासून बिघाड निर्माण झाल्याने देसाईगंज शहरातील ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. मार्च महिन्याचा प्रारंभ असल्याने अनेकांना कर्जाचे हप्ते भरण्याची घाई आहे. अशातच एटीएम बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. देसाईगंज शहरात स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, युनियन बँक, आयडीबीआय बँक, कोआॅपरेटीव्ह बँक आहे. यातील सर्वच बँकांचे एटीएम शहरात लावण्यात आले आहेत. नोटबंदीपासून या बँकांमध्ये रोकडचा तुटवडा असल्याने या बँकांचे एटीएम नावापुरतेच सुरू आहेत. केवळ एसबीआयचे एटीएम सुरू राहत होते. या एटीएममध्ये अपवाद वगळता नेहमीच पैसे राहत नसल्याने या एटीएमसमोर नोटबंदीच्या कालावधीतही मोठी गर्दी राहत होती. शहरातील बहुतांश ग्राहक एसबीआय एटीएमच्या माध्यमातूनच पैसे काढतात. या एटीएममध्ये शुक्रवारपासून अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. चार ते पाच ग्राहकांनी पैसे काढल्यानंतर सदर एटीएम बंद पडते. याबाबतची तक्रार बँकेकडे केल्यानंतर बँक कर्मचारी दुरूस्त करतात.पण आणखी काही वेळातच सदर एटीएम बंद पडते. त्यामुळे रांगेत लागलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागते. याबाबत एसबीआयचे मॅनेजर बी. यू. वाघमारे यांना विचारणा केली असता, मागील तीन-चार दिवसांपासून एटीएममध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. याबाबतची तक्रार टेक्निशियनकडे करण्यात आली आहे. एक-दोन दिवसात एटीएम दुरूस्त केले जाईल, अशी माहिती लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली. (तालुका प्रतिनिधी)