शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

२२ वर्षांनंतरही देसाईगंजला बसस्थानक नाही

By admin | Updated: January 7, 2015 22:52 IST

२८ हजार ६७५ लोकसंख्या असलेल्या देसाईगंज शहरात मागील २२ वर्षांपासून बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याकडे अद्यापही शासनाने लक्ष दिलेले नाही. ज्या रेल्वे मार्गामुळे देसाईगंज शहराचे

स्वच्छतेचा बोजवारा : रेल्वे फाटकाने डोकेदुखी वाढविलीमहेंद्र चचाणे - देसाईगंज२८ हजार ६७५ लोकसंख्या असलेल्या देसाईगंज शहरात मागील २२ वर्षांपासून बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याकडे अद्यापही शासनाने लक्ष दिलेले नाही. ज्या रेल्वे मार्गामुळे देसाईगंज शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे, त्या ठिकाणी भूमिगत पुलाचे बांधकाम रखडले आहे. याशिवाय शहराचे अनेक प्रश्न सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. त्यामध्ये स्वच्छता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. देसाईगंज शहराला अनेक समस्यांनी ग्रासले असून यामध्ये बसस्थानकाचा अभाव, रेल्वे फाटकामुळे दररोज नागरिकांना तासभर थांबावे लागते. त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी तसेच शहराच्या प्रभागांमध्ये स्वच्छतेचा अभाव व वाढते अतिक्रमण या मुद्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. तालुक्याची निर्मिती होऊन २२ वर्ष झाले. परंतु अजुनही या शहराला बसस्थानक मिळालेले नाही. बसस्थानकाच्या इमारतीसाठी कधी आरमोरी मार्गावर तर कधी कुरखेडा मार्गावर जागा निश्चित करण्यात आली, असे सांगण्यात येते. मात्र अजुनही बसस्थानक कुठे होणार या मुद्यावरच शासनाला निर्णय घेता आले नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेलगत छोट्या शेडमध्ये बस निवारा सुरू आहे. भूयारी रेल्वे पुलाचा तिढारेल्वे मार्ग शहरातून गेला असल्याने या शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. दक्षिणेकडील बाजारपेठ, शासकीय कार्यालय, स्टेडीयम आहे. तर उत्तरेकडील भागात रहिवासी वस्ती आहे. चंद्रपूर ते गोंदिया या रेल्वे मार्गावर असलेल्या वडसा (देसाईगंज) रेल्वे स्थानक येथून दररोज ५ ते ८ वेळा एक्सप्रेस गाड्या, साध्या प्रवाशी गाड्या व माल गाड्या धावत असतात. प्रत्येक गाडीच्या आवागमनाला १५ ते २० मिनिटांपूर्वी रेल्वे फाटक बंद केले जाते. त्यामुळे दक्षिण व उत्तर बाजुला वाहनांची प्रचंड रांग लागते. त्यामुळे दररोज ५ ते ८ वेळा अर्धा ते एक तास वाहतुकीची कोंडी होते. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मागील सहा महिन्यांपूर्वी भूमिगत रेल्वे पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु ते सध्या संथगतीने सुरू आहे. या संदर्भात ३१ मार्चपर्यंत काम मार्गी लावा, असे खा. अशोक नेते यांनी रेल्वेच्या संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.