शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शेकडो शासकीय कर्मचाऱ्यांची जिल्हा कचेरीसमोर निदर्शने

By admin | Updated: August 12, 2015 01:24 IST

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ

शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा केला निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर; कुरखेडातही झाले कर्मचाऱ्यांचे आंदोलनगडचिरोली : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व राज्य सरकारी, कर्मचारी संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या सभेत केंद्र व सर्व राज्य सरकारच्या कर्मचारी विरोधी व जनविरोधी धोरणाचा प्रतिवाद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. केंद्रासह सरकारी कर्मचारी पदभरतीवर शासनाने बंदी घातली असून कंत्राटी व नैमत्मीक कर्मचारी नेमण्याचे धोरण शासनाने स्वीकारले. या धोरणाच्या विरोधात सोमवारी जिल्ह्यातील सर्व राज्य कर्मचारी व जिल्हा परिषदेचे कर्मचारी जि.प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे व मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष एस. पी. चडगुलवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा घोषणेबाजीतून निषेध केला. यावेळी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या पाठीशी ठाम राहून लढा देण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रतन शेंडे यांनी केली. यावेळी जि.प. कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस दुधराम रोहणकर, कार्याध्यक्ष राजकुमार पारधी, उपाध्यक्ष साईनाथ दुमपट्टीवार, संजय खोकले, ग्रामसेवक देवानंद फुलझेले, सरचिटणीस प्रदीप भांडेकर, खुशाल जुवारे, व्यंकटेश कंबगौनी, फिरोज लांजेवार, माया बाळराजे, लतिफ पठाण, किशोर सोनटक्के, नैना उध्दरवार आदीसह बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते. संघटनेच्या शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. कुरखेडा तालुका मुख्यालयातही आंदोलन झाले. (स्थानिक प्रतिनिधी)या आहेत मागण्याकंत्राटी आणि नैमित्तिक वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून निश्चित लाभाची वैधानिक पेन्शन योजना सुरू करावी, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने लागू केलेल्या तारखेपासून लागू करावे, न्यायालयीन मॅटची व्यवस्था पूर्ववत चालू ठेवावी, सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावीत.