शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

धुलिवंदनासाठी पाण्याच्या फुग्यांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:32 IST

धुलिवंदनाचा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी रंगांची उधळण करण्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांनी गडचिरोलीतील दुकाने सजायला लागली आहेत.

ठळक मुद्देस्वस्ताईमुळे रासायनिक रंगांची विक्री : बच्चेकंपनींसाठी बंदुकांचे आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धुलिवंदनाचा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी रंगांची उधळण करण्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांनी गडचिरोलीतील दुकाने सजायला लागली आहेत.धुलिवंदनाच्या आधल्या दिवशी होळी सण साजरा केला जातो तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला रंगपंचमी असेही संबोधले जाते. गावखेड्यात पूर्वी झाडांच्या फुलांपासून रंग बनविले जात होते. त्याचाच वापर केला जात होता. आता मात्र फुलांची जागा दुकानातील रंगांनी घेतली आहे. त्यामुळे रंग व विविध साहित्यांनी दुकाने सजण्यास सुरूवात झाली आहे.बच्चेकंपनी रंगाची उधळण करण्यासाठी बंदूक, पंप, पिचकाºया यांचा वापर करतात. ३५ ते ३५० रुपयांपर्यंत किमतीच्या बंदुका उपलब्ध आहेत. मागील दोन ते तीन वर्षांपासून वॉटर बलूनच्या माध्यमातून रंगाची उधळण करण्याचा नवीन ट्रेड बच्चे कंपनीमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे वॉटर बलूनची विक्री वाढत चालली आहे.रसायनमिश्रीत रंगापेक्षा हर्बल कलरची किंमत जास्त असते. त्यामुळे शरीरासाठी अपायकारक असले तरी स्वस्त दरात मिळणाऱ्या रासायनिक रंगांचीच मागणी ग्राहकांकडून केली जात असल्याचे एका दुकानदाराने सांगितले.उद्या गावोगावी पेटणार होळ्याबुधवार दि.२० रोजी जिल्हाभरात होळ्या पेटतील. सायंकाळी पेटणाऱ्या होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची पध्दत रूढ आहे. होळीचा सण साजरा करण्यामागे आख्यायिका सांगितली जाते. आख्यायिकेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपने धाडलेल्या होलिकेचा विष्णूने वध केला होता. होलिकेला अग्नी जाळू शकणार नाही, असा तिला वरदान होता. प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. यात प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहण झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते. ग्रामीण भागात होळीच्या सणाला शिमगा असे संबोधले जाते.कडक प्लास्टिकचे मास्क पहिल्यांदाच बाजारातयापूर्वी साध्या प्लास्टिकचे १० रुपये किमतीचे मास्क उपलब्ध होते. विविध प्रकारचे मास्क राहत असल्याने बच्चेकंपनीकडून या मास्कची विशेष मागणी राहते. मात्र साधे प्लास्टिक लवकरच फाटते. त्याचबरोबर लावण्यासाठी वापरलेले रबरही तुटते. यावर्षी पहिल्यांदाच कडक प्लास्टिकपासून बनलेले मास्क बाजारात आले आहे. या मास्कला अतिशय चांगल्या दर्जाचे रबर लावण्यात आले आहे. सदर मास्क बच्चेकंपनींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.