शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

धुलिवंदनासाठी पाण्याच्या फुग्यांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:32 IST

धुलिवंदनाचा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी रंगांची उधळण करण्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांनी गडचिरोलीतील दुकाने सजायला लागली आहेत.

ठळक मुद्देस्वस्ताईमुळे रासायनिक रंगांची विक्री : बच्चेकंपनींसाठी बंदुकांचे आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धुलिवंदनाचा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी रंगांची उधळण करण्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांनी गडचिरोलीतील दुकाने सजायला लागली आहेत.धुलिवंदनाच्या आधल्या दिवशी होळी सण साजरा केला जातो तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला रंगपंचमी असेही संबोधले जाते. गावखेड्यात पूर्वी झाडांच्या फुलांपासून रंग बनविले जात होते. त्याचाच वापर केला जात होता. आता मात्र फुलांची जागा दुकानातील रंगांनी घेतली आहे. त्यामुळे रंग व विविध साहित्यांनी दुकाने सजण्यास सुरूवात झाली आहे.बच्चेकंपनी रंगाची उधळण करण्यासाठी बंदूक, पंप, पिचकाºया यांचा वापर करतात. ३५ ते ३५० रुपयांपर्यंत किमतीच्या बंदुका उपलब्ध आहेत. मागील दोन ते तीन वर्षांपासून वॉटर बलूनच्या माध्यमातून रंगाची उधळण करण्याचा नवीन ट्रेड बच्चे कंपनीमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे वॉटर बलूनची विक्री वाढत चालली आहे.रसायनमिश्रीत रंगापेक्षा हर्बल कलरची किंमत जास्त असते. त्यामुळे शरीरासाठी अपायकारक असले तरी स्वस्त दरात मिळणाऱ्या रासायनिक रंगांचीच मागणी ग्राहकांकडून केली जात असल्याचे एका दुकानदाराने सांगितले.उद्या गावोगावी पेटणार होळ्याबुधवार दि.२० रोजी जिल्हाभरात होळ्या पेटतील. सायंकाळी पेटणाऱ्या होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची पध्दत रूढ आहे. होळीचा सण साजरा करण्यामागे आख्यायिका सांगितली जाते. आख्यायिकेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपने धाडलेल्या होलिकेचा विष्णूने वध केला होता. होलिकेला अग्नी जाळू शकणार नाही, असा तिला वरदान होता. प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. यात प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहण झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते. ग्रामीण भागात होळीच्या सणाला शिमगा असे संबोधले जाते.कडक प्लास्टिकचे मास्क पहिल्यांदाच बाजारातयापूर्वी साध्या प्लास्टिकचे १० रुपये किमतीचे मास्क उपलब्ध होते. विविध प्रकारचे मास्क राहत असल्याने बच्चेकंपनीकडून या मास्कची विशेष मागणी राहते. मात्र साधे प्लास्टिक लवकरच फाटते. त्याचबरोबर लावण्यासाठी वापरलेले रबरही तुटते. यावर्षी पहिल्यांदाच कडक प्लास्टिकपासून बनलेले मास्क बाजारात आले आहे. या मास्कला अतिशय चांगल्या दर्जाचे रबर लावण्यात आले आहे. सदर मास्क बच्चेकंपनींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.