शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

रोहयोची मागणी वाढली

By admin | Updated: June 28, 2017 02:22 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत सुमारे १ लाख ७ हजार

नागरिकांची विशेष पसंती : एक लाख कुटुंबांना तीन महिन्यात रोजगारलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत सुमारे १ लाख ७ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावरून ग्रामीण भागातील नागरिक इतर रोजगारांपेक्षा रोजगार हमी योजनेच्या कामांना विशेष पसंती दर्शवित असल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी शासनाने देशरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. सदर योजनेचे काम अगदी सुरुवातीपासून अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सत्ता बदल झाल्यानंतर अनेक योजना बदलल्या. काही योजनांमध्ये अंशत: बदल करण्यात आला. मात्र भाजपा सरकारनेही या योजनेत बदल केला नाही. यावरून या योजनेचे यश दिसून येत आहे.एप्रिल ते जून २०१७ या तीन महिन्यांच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ७ हजार ९९१ मनुष्य दिवस रोजगार निर्मिती करण्यात आला आहे. यामाध्यमातून सुमारे ५३ हजार ६०१ कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. ९७० कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. ३३६ अपंग नागरिकांनाही सदर रोजगार उपलब्ध झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात उन्हाळ्यात शेतीची कामे सुरू राहत नाही. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या भरवशावरच नागरिकांना अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी वाढते. रोजगार योजनेचे काम यापूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत नंतर दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहत होते. मात्र या कामात बदल करण्यात आला आहे. आता रोजगार हमीचे काम सकाळीच केले जाते. दिवसभर उन्हाचा फटका मजुरांना बसत नसल्याने मजूर या कामांना विशेष पसंती देत असल्याचे दिसून येते. पावसाळ्याच्या दिवसात मात्र शेतीची कामे सुरू होत आहेत. या माध्यमातून शेतकरी व शेतमजुरांना शेतीचा रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत रोहयो कामांची मागणी कमी होते. हिवाळ्यातही रोहयोच्या कामाची मागणी वाढते.