शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पन्नेमाराजवळ पूल बांधण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:49 IST

तालुक्यातील पन्नेमारा-होचेटोला मार्गावर असणाऱ्या नाल्यावर मागील अनेक वर्षांपासून पूल बांधकामाची मागणी आहे. परंतु या मागणीकडे शासनाचे सातत्त्याने दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात शालेय विद्यार्थी व नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागतो.

ठळक मुद्देशासनाचे दुर्लक्ष : चार महिने करावा लागतो धोकादायक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील पन्नेमारा-होचेटोला मार्गावर असणाऱ्या नाल्यावर मागील अनेक वर्षांपासून पूल बांधकामाची मागणी आहे. परंतु या मागणीकडे शासनाचे सातत्त्याने दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात शालेय विद्यार्थी व नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागतो.पावसाळ्यात तीन ते चार महिने सदर मार्ग बंद राहत असतो. मुरूमगावपासून तीन किमी अंतरावर पन्नेमारा-होचेटोला दरम्यान नाला आहे. या भागातील नागरिक सदर नाला ओलांडून धोकादायक प्रवास करतात. विशेष म्हणजे, होचेटोला गावाजवळ दोन मोठे नाले आहेत. पावसाळ्यात दोन्ही नाले दुथडी भरून वाहत असतात. त्यामुळे येथून आवागमन करण्यासाठी नागरिकांना प्रचंड अडचणी येतात. अत्यंत महत्त्वाचे काम असल्यास नागरिक विविध साधनांच्या माध्यमातून नाला पार करतात. दरम्यान एखाद्या रूग्णाला उपचारार्थ तालुका स्तरावर नेत असताना अडचणी येतात.धानोरा व मुरूमगावशी या परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. येथे उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना दैैनंदिन गरजेच्या वस्तूंची साठवणूक पावसाळ्यापूर्वी करावी लागते. अनेक नागरिक पूर्वीपासूनच साहित्याची जुळवाजुळव करतात. तरीसुद्धा अनेक समस्या उद्भवतात. परिणामी नाईलाजास्तव त्यांना त्रास सहन करावा लागतो. येथे उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.